रांची | झारखंड येथील हजारीबाग येथे महात्मा गांधी यांचा पुतळा पडलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मात्र, हा पुतळा पडला की पाडण्यात आला याबाबत पोलीस तपास करत आहेत. मात्र, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
पुतळा स्व:ता पडला की कोणी त्याची तोडफोड केली याबाबत आम्ही चौकशी करत आहोत. या प्रकरणी आम्ही सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहोत. काही लोकांची चौकशीही केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. एनआयएने याबाबत ट्विट केलं आहे.
8 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे तुकडे झाले आहेत, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. गाधींचा हा पुतळा स्मारक म्हणून 2 फेब्रुवारी 1948 रोजी स्थापन करण्यात आला होता.
महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड झाल्याची तक्रार गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष मनोज वर्मा यांनी दाखल केली ह आहे. पुतळ्याची तोडफोड झाली असेल तर ती करणाऱ्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
Jharkhand: Mahatama Gandhi’s statue in Hazaribagh found damaged. Police say, “We are investigating to ascertain whether the statue fell itself or was vandalized. We are also checking CCTV footage and questioning some people”. pic.twitter.com/u6EHS08wCC
— ANI (@ANI) February 9, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
“काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत सत्ता चालवणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये”
गोडसेला श्रद्धांजली वाहण्यासाठी गांधींना शिव्या घालण्याची गरज नाही- संजय राऊत
महत्वाच्या बातम्या-
…तर राज ठाकरेंच्या मोर्चाला आमचं समर्थन असेल- राजू शेट्टी
“केजरीवालांचा पराभव होणार, असं झालं नाही तर पुन्हा कधीच निवडणूक लढवणार नाही”
ओबीसींचा रकाना सामाविष्ट न केल्यास जनगणनेवर बहिष्कार- नाना पटोले
Comments are closed.