नवी मुंबई | शरद पवारांना माहिती आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का सोडला. त्यांनी अधिकाराने मला सुनावलं, तर मी गप्प बसेन, असं उत्तर भाजप आमदार गणेश नाईक यांनी दिलंय.
राष्ट्रवादीचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत शाब्दिक वादावादी झाल्यानंतर नाईकांनी भावना व्यक्त केल्या. ते नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
मी राष्ट्रवादीमध्ये 20 वर्ष काम केलं होतं. मला आतापर्यंत शरद पवार काहीही बोलले नाही. त्यांनाही माहिती आहे की मी पक्ष कशासाठी सोडला. आणि मलाही माहिती आहे की मी काय गमावलं, असं गणेश नाईक यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, मला इन्कम टॅक्स, ईडी किंवा कुठल्याही गुंडाकडून भीती नाही. माझा हात साफ आहे, असं गणेश नाईक म्हणाले आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
गेल्या 20 दिवसांत चौथ्यांदा आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला!
“आपल्या मुली विश्वचषकाच्या फायनलपर्यंत गेल्या याचा आपल्याला आनंद आणि अभिमान पाहिजेच”
महत्वाच्या बातम्या-
मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
होळीत कोणतंही झाड जाळू नका, मनातून अंधश्रद्धा दूर करा- सयाजी शिंदे
“चांदमियां पाटील छातीत खरंच राम आहे ना?, मग बडवता कशाला”
Comments are closed.