Gangster Arun Gawli | कुख्यात गँगस्टर अरुण गवळी हा तुरंगातून बाहेर येणार आहे. त्याला 28 दिवसाची संचित रजा मंजूर झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने डॉन अरुण गवळीला (Gangster Arun Gawli) 28 दिवसांची रजा मंजूर केली. न्यायमूर्ती नितीन सांबरे व वृषाली जोशी यांनी यासंदर्भात मोठा निर्णय दिलाय.
अरुण गवळीने यापूर्वी कारागृह उपमहानिरीक्षक यांच्याकडे संचित रजेसाठी अर्ज केला होता. मात्र, तो अर्ज मंजूर झाला नाही. त्यामुळे त्याने न्यायालयात धाव घेतली होती. अशात नागपूर खंडपीठाने त्याला 28 दिवसांची संचित रजा म्हणजे फर्लो मंजूर केली. त्याने गेल्यावर्षी 18 ऑगस्ट 2024 रोजी नागपूरच्या कारागृह महानिरीक्षक यांच्याकडे संचित रजेसाठी अर्ज केला होता.पण कारागृह महानिरीक्षकांनी तो अर्ज फेटाळला होता.
गवळीला 28 दिवसांचा फर्लो मंजूर
याच निर्णयाच्या विरोधात अरुण गवळीने (Gangster Arun Gawli) आपल्या वकिलांच्या माध्यमातून नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. त्याच्या याचिकेसंदर्भात नागपूर खंडपीठाने मोठा निर्णय दिलाय. गवळीचे वकील अॅड. मीर नगमान अली यांनी कारागृह उपमहानिरीक्षकांचा निर्णय अवैध असल्याचा दावा कोर्टात केला.
त्यावर नागपूर खंडपीठाने विविध बाबी लक्षात घेवून गवळीची याचिका मंजूर केली. दरम्यान, अरूण गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. 2007 मध्ये ही घटना घडली होती. यात अरुण गवळीसह इतर 11 जणांना 2012 मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.
फर्लो म्हणजे काय?
अशात त्याला 28 दिवसांची संचित रजा मंजूर झाली आहे.म्हणजेच तो आता तुरुंगातून बाहेर येणार आहे. गवळीला 28 दिवसांची संचित रजा म्हणजे फर्लो मंजूर झाली आहे. फर्लो म्हणजे ही एक सूट आहे, जी तुरुंगातील कैद्याला स्वातंत्र्याच्या रूपात मिळते. काही काळ तुरुंगात राहून शिक्षा भोगलेल्या कैद्याचा हा अधिकार मानला जातो. या सूटमुळे कैद्याला त्याच्या कुटुंबीयांना भेटण्याची संधी मिळते. (Gangster Arun Gawli)
News Title – Gangster Arun Gawli will come out of jail
महत्त्वाच्या बातम्या –
बीड पुन्हा हादरलं! ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा सापडला मृतदेह
राज्यात टक्कल व्हायरसचा धुमाकूळ; ‘या’ लोकांना सर्वाधिक धोका
कोल्हापूर हादरलं! भाचीच्या लग्नात मामाने जेवणात टाकलं विष अन् अख्ख गाव…
जाणून घ्या पुढील 10 दिवस राज्यातील हवामान कसं असणार?
“कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणारच, सरकारने…”; मस्साजोग गावकरी प्रचंड दहशतीत?