सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा, सरकारचा मोठा निर्णय!

government employee

Government Employees | केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून मोठा निर्णय घेतला आहे. महागाई भत्त्यात (DA) वाढ होण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांच्या पगारात 50% वाढ होणार आहे. त्यामुळे एप्रिलपासून सरकारी कर्मचाऱ्यांचे भविष्य उज्ज्वल होणार आहे.

DA वाढीपूर्वीच 50% वाढ?

सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Government Employees) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) च्या पर्यायास रूपात युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) सुरू करण्यात आली आहे. ही योजना 24 जानेवारी 2025 रोजी जाहीर करण्यात आली होती आणि ती एप्रिलपासून लागू होणार आहे.

युनिफाइड पेन्शन स्कीम म्हणजे काय?

ही योजना केवळ त्याच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (Government Employees) लागू आहे, जे आधीच NPSमध्ये सामील आहेत. कर्मचाऱ्यांना NPS आणि UPS यामधून कोणतीही योजना निवडण्याचा पर्याय असेल. UPS अंतर्गत कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन दिले जाईल, जे मागील वर्षभराच्या सरासरी मूलभूत वेतनाच्या 50% इतके असेल.
पेन्शनसाठी पात्रता आणि कुटुंबीयांसाठी लाभ

25 वर्षे सेवा पूर्ण केलेली असावी-

कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला पेन्शन मिळेल, जी मूळ पेन्शनच्या 60% इतकी असेल. योजनेत किमान निश्चित पेन्शनची तरतूद आहे. 10 वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर किमान ₹10,000 पेन्शन मिळण्याचा अधिकार असेल. या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळणार असून, याचा मोठा फायदा होईल. एप्रिल महिन्यात ही योजना लागू झाल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनात मोठी वाढ होणार आहे.

News Title : Government Employees Big Salary Hike in April

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .