नागपूर | तूर आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण तूर आणि हरभऱ्याचे पैसे शेतकऱ्यांना 15 दिवसात मिळणार असल्याचं सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितले.
तूर आणि हरभऱ्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले असले तरी शेतकऱ्यांना त्याचे पैसे न मिळाल्याबाबत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंंनी जाब विचारला होता. त्यावर देशमुखांनी आश्वासन दिलं.
दरम्यान, शासनाने खरेदी केलेल्या तुरीची भरडाई करुन केलेली तूरडाळ स्वस्त धान्य दुकानातून 35 रुपये प्रती किलोप्रमाणे विक्री करण्यात येत आहे, असंही देशमुखांनी यावेळी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या–
-भिडेंच्या वक्तव्याचे पंढरपूरमध्ये पडसाद; पुतळ्याचे दहन
-शिवाजी महाराज असते तर भाजप सरकारचा रांझ्याचा पाटील झाला असता!
-शेतकऱ्यांची थट्टा लावली आहे का?- अजित पवार
-मुख्यमंत्री साहेब खोटं बोलू नका, जमीन देणाऱ्यांची नावे जाहीर करा!
-या लोकांना आयाबहिणी नाहीत का?; अजित पवारांचा संतप्त सवाल
Comments are closed.