लखनऊ | हाथरस प्रकरणावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका होत असतानाच भाजपच्या माजी आमदारानं या प्रकरणी धक्कादायक दावा केला आहे.
हाथरसमध्ये सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेची तिच्या आई आणि भावानं हत्या केल्याचा दावा भाजपच्य माजी आमदारानं केला आहे. ‘न्यूज 18’ वृत्तवाहिनीनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
मुलीची तिच्या आईने आणि भावानेच हत्या केली आहे. या प्रकरणात जातीवादावरून राजकारण केलं जात आहे. चारही युवक निर्दोष आहे. त्यांना फसवण्यात आलं आहे, असा दावा राजवीर सिंह पहेलवान यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
“योगीजी मी तुमच्यापेक्षा वरिष्ठ आहे, माझं ऐका, पीडितांना भेटू द्या”
“पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करून जबाबदारी झटकू नका, योगीजी राजीनामा द्या”
“योगी आदित्यनाथ यांना 50 लाख देतो त्यांनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडावी”
कोरोना झाल्यावर ममता बॅनर्जींना मिठी मारेन म्हणणाऱ्या भाजप नेत्याला कोरोनाची लागण