मी रस्त्यावर उतरून लढणारी बाई आहे; भाजपला तर 50 जागाही मिळाल्या नसत्या, जर…
कोलकाता | निवडणूक आयोगाच्या मदतीशिवाय भाजपला 50 पेक्षा जास्त जागाही मिळाल्या नसत्या, असा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसच्या कर्ता-धर्ता ममता बॅनर्जी यांनी केला आहे. निवडणूक आयोग भाजपचा प्रवक्ता असल्यासारखं वागत होतं. निवडणूक आयोगाची एकंदरित वागणूकच भयंकर होती, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
एका मुलाखतीत ममता बॅनर्जी यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे. तृणमूल काँग्रेसची यावर्षी डबल सेंच्युरी होईल आणि आम्ही 221 चा आकडा गाठू, असा आम्हाला विश्वास होता. मी रस्त्यावर उतरून लढणारी बाई आहे. पहिल्यापासूनच मी सांगत होते की, आम्ही 200 च्या पार जाऊ तर भाजप 70 च्या पुढेही जाणार नाही. निवडणूक आयोगानं भाजपला मदत केली नसती तर त्यांना 50 जागाही मिळाल्या नसत्या, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी ईव्हीएम यंत्रांशी छेडछाड करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी पोस्टल बॅलेटस् रद्द ठरवण्यात आली, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. मात्र, मी बंगालच्या लोकांना सलाम करते. त्यांनी फक्त पश्चिम बंगाललाच नव्हे तर संपूर्ण देशाला वाचवलं असं, ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, नंदीग्राम मतदारसंघात माझा अजून पराभव झालेला नाही. आम्ही त्याठिकाणी पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली आहे. त्याठिकाणी काही फेरफार करण्यात आले आहेत. मतदानाच्यादिवशीही मी नंदीग्राममध्ये एका मतदान केंद्राबाहेर तीन तास बसून होते. कारण त्याठिकाणी लोकांना मतदान करु दिले जात नव्हते. मात्र, नंदीग्राममध्ये पुन्हा मतमोजणी करण्यासाठी न्यायालयात जाणार का, याविषयी अजून निर्णय झाला नसल्याचं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या –
पुढच्या 2 दिवसात राज्यभरात गारपिटीची शक्यता; हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना ‘हे’ आवाहन
दिलासादायक! महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांसह मृतांच्या संख्येतही घट, जाणुन घ्या आकडेवारी एका क्लिकवर
“हा विजय म्हणजे मस्तवाल राजकारणास मिळालेली चपराक आहे, भाजप हारला कोरोना जिंकला”
मुंबईतील कोरोनाबाधितांची आकडेवारी दिलासादायक; बरे होणाऱ्यांची संख्या अधिक
तामिळनाडूत कोणी केला कमल हसन यांचा पराभव?
Comments are closed.