औरंगाबाद | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये सभा घेत मशिदींवरील भोंग्यांविरोधात आणखी एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मशिदींवरील लाऊडस्पीकर 4 तारखेपर्यंत उतरवा नाहीतर मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावणार, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.
राज ठाकरेंच्या सभेनंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz jaleel) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल बोलताना इम्तियाज जलील यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
राज ठाकरेंच्या भाषणावर मुस्लीम समाजानं प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, असं आवाहन इम्तियाज जलील यांनी केलं आहे. नेत्यांचे अनुकरण जनता करत असते. त्यामुळे नेत्यांनी तरूणांना चांगली दिक्षा द्यायला हवी, असा टोला इम्तियाज जलील यांनी लगावला आहे.
दरम्यान, राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना भोंगे लावण्याचे आवाहन केले. स्वत: मात्र आयोध्येला जाणार आहेत. राज ठाकरे स्वत: भोंगे उतरविण्याच्या आंदोलनात सहभागी होणार का? असा सवाल देखील खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत खालावली, महत्त्वाची माहिती समोर
आनंदाची बातमी! लोकल प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
“जमलंच तर तुटून पडा भ्रष्टाचाऱ्यांच्या टोळीवर, किती दिवस तूप ओढणार आपणच आपल्या पोळीवर”
‘शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदरेंना त्रास दिला’; राज ठाकरेंचा गंभीर आरोप
शरद पवारांना नास्तिक बोललो तर झोंबलं, पण त्यांची कन्याच…- राज ठाकरे
Comments are closed.