विमानप्रवाशांसाठी धक्कादायक बातमी! भारतातील ३२ विमानतळ बंद; जाणून घ्या यादी

Airport shut

Airport Shutdown | भारत-पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका आता हवाई वाहतुकीवर बसत आहे. देशभरातील एकूण ३२ विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले असून, मुंबई आणि दिल्लीतील २५ अंतर्गत हवाई मार्गही बंद करण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत. (32 Airport Shutdown)

9 ते 14 मे दरम्यान विमानतळ बंद :

भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ (Opration sindhoor) नंतर पाकिस्तानने भारतावर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न केल्यानंतर केंद्र सरकारने उच्चस्तरीय सुरक्षा उपाय लागू केले आहेत. ९ ते १४ मे २०२५ या कालावधीत खालील ३२ विमानतळ तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत:

आधमपूर, अंबाला, अमृतसर, अवंतीपूर, भटिंडा, भूज, बिकानेर, चंदीगढ, हलवारा, हिंडन, जैसलमेर, जम्मू, जामनगर, जोधपूर, कंडला, कांगडा, केशोड, किशनगढ, कुल्लू मनाली (भुंतर), लेह, लुधियाना, मुंद्रा, नालिया, पठाणकोट, पटियाला, पोरबंदर, राजकोट (हिरासर), सरस्वा, शिमला, श्रीनगर, थोईसे, उत्तरलाई हे विमानतळ बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच या विमानतळांवरील सर्व नागरी विमानसेवा पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. (32 Airport Shutdown)

Airport Shutdown | प्रवाशांसाठी दिल्ली विमानतळाची विशेष सूचना:

“बदलत्या हवाई परिस्थितीमुळे काही उड्डाण वेळा प्रभावित होऊ शकतात. कृपया वेळेपूर्वी पोहोचा, तुमच्या एअरलाइनशी संपर्क ठेवा आणि फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा.”

केंद्र सरकारने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, फक्त अधिकृत स्त्रोतांवर आधारित माहितीच शेअर करावी, असे आवाहन केले आहे.

News Title: India-Pakistan Tension: 32 Airports Temporarily Shut, Mumbai-Delhi Flights Affected – Full List Inside

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .