Indian Missiles | पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा बळी गेल्यानंतर पाकिस्तानविरोधात कठोर कारवाईची मागणी वाढली आहे. पाकिस्तानकडून युद्धाची भाषा सुरु असली तरी भारताकडे अशी ताकद आहे की फक्त तीन मिसाइल्सच्या आधारे पाकिस्तानच्या महत्वाच्या शहरांना काही मिनिटांत निष्प्रभ करता येईल.
भारताच्या या मिसाइल्सची ताकद इतकी प्रचंड आहे की लाहोर, इस्लामाबाद आणि कराचीसारखी प्रमुख शहरे केवळ काही सेकंदांत किंवा मिनिटांत लक्ष्य केली जाऊ शकतात. चला जाणून घेऊया कोणती आहेत ही तीन मिसाइल्स आणि त्यांची क्षमता.
Indian Missiles | ब्रह्मोस, शौर्य आणि प्रलय: भारताची तीन शक्तिशाली मिसाइल्स :
ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाइल :
ब्रह्मोस हे भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेले जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूज मिसाइल आहे. याची गती आणि अचूकता अत्यंत प्रभावी आहे. ब्रह्मोसच्या साहाय्याने अमृतसरहून लाहोरला ७२ सेकंदांपेक्षा कमी वेळात टार्गेट करता येते. इस्लामाबादपर्यंत ब्रह्मोस फक्त ५ मिनिटांत पोहोचू शकते, तर कराचीसाठी ५ ते ६ मिनिटे पुरेशी आहेत.
शौर्य क्वासी-बॅलिस्टिक मिसाइल :
शौर्य मिसाइल अणवस्त्र वाहून नेण्यास सक्षम असून त्याची रेंज ७०० ते १९०० किलोमीटर आहे. हायपरसोनिक गतीमुळे लाहोरला ३० सेकंदांमध्ये, इस्लामाबादला ३ ते ४ मिनिटांत आणि कराचीला ४ ते ५ मिनिटांत लक्ष्य करता येते. शौर्यची मोबाईल लॉन्चिंग क्षमता आणि रडारला चकवा देणारी गती ही पाकिस्तानसाठी मोठा धोका आहे.
प्रलय बॅलेस्टिक मिसाइल :
प्रलय मिसाइलची रेंज १५० ते ५०० किलोमीटर असून, हे हायपरसोनिक गतीने उड्डाण करते. प्रलय मिसाइलने लाहोरला ३०-४० सेकंदात, इस्लामाबादला २-३ मिनिटांत आणि कराचीला ३-४ मिनिटांत लक्ष्य करता येते. मल्टीपल टार्गेट हिट करण्याची क्षमता प्रलयला आणखी प्रभावी बनवते.
Indian Missiles | पाकिस्तानसाठी गंभीर इशारा :
भारताने शांततेने आणि संयमाने उत्तर देण्याची भूमिका घेतली असली तरी पाकिस्तानकडून जर अतिरेक झाला, तर भारताकडे तात्काळ आणि निर्णायक कारवाई करण्याची क्षमता आहे. ब्रह्मोस, शौर्य आणि प्रलय या तीन मिसाइल्स पाकिस्तानच्या संरक्षण यंत्रणेवर थेट प्रहार करू शकतात आणि युद्धाची दिशा एका रात्रीत बदलू शकते.