क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! आयपीएलचे सामने आता ‘या’ देशात खेळले जाणार; BCCI करणार घोषणा?
मुंबई | इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या 14व्या पर्वाला भारतातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता स्थगिती देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. पण आता हे सामने परत एकदा होणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. देशभरात कोरोनाने थैमान घातल्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आयपीएलमध्येही शिरकाव केला. तसेच अनेक संघातील खेळाडू तसेच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली.
आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर बीसीसीआयने आयपीएलचे सामने थांबवून उर्वरित 31 सामने स्थगित करण्याचा निर्णय घेतला. परंतु, यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळालं. पण आता आयपीएलचे उर्वरित सामने पुन्हा एकदा संयुक्त अरब अमिराती येथे आयोजित केले जाण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयला काहीही करून 14 वे पर्व संपवायचे आहे. कारण 14व्या पर्वातील उर्वरित 31 सामने झाले नाही तर बीसीसीआयला तब्बल 3 हजार कोटींचे नुकसान होणार आहे. येत्या सप्टेंबरमध्ये संयुक्त अरब अमिराती येथे आयपीएलचे उर्वरित सामने आयोजित केले जाण्याची शक्यता आहे. तसेच याची 29 मे रोजी बीसीसीआय घोषणा करू शकतं, असं एका रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.
मागच्यावर्षी भारतातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता संयुक्त अरब अमिरातीमध्येच आयपीएलचं 13 वं पर्व पार पडलं होतं. त्यानंतर यावर्षी देखील तिथेच आयपीएलचे सामने खेळवले जावे, अशा मागणीने जोर धरला होता. पण बीसीसीआयने भारतातील 6 शहरात आयपीएलचे सामने आयोजित केले. येत्या 29 मे रोजी बीसीसीआय आता नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या –
कुटुंबीयांनी प्रेमविवाहाला नकार दिल्याने पुण्यातील प्रेमीयुगुलाने उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल
औरंगाबादमध्ये शेतकरी कुटुंबाला मारहाण; गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ, पाहा व्हिडिओ
साखरपुडा एकीसोबत, लग्न दुसरीसोबत; जालन्यातील घटनेनं एकच खळबळ
मुलीने घरमालकाच्या मुलाला भाऊ मानून बांधली राखी, त्याच भावाने मित्रासोबत मिळून केला गँगरेप
कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात पण श्रेय कुणाचं?, मुख्यमंत्र्यांचं उत्तर ऐकून अभिमान वाटेल!
Comments are closed.