नवी दिल्ली | मी सक्रीय राजकारणातून निघून गेले कारण माझ्यावर अॅसिड हल्ला करण्याचं षडयंत्र रचलं गेलं होतं, असा गंभीर आरोप जयाप्रदा यांनी समाजवादी पक्षाचे उमेदवार आजम खान यांच्यावर केला आहे.
उत्तर प्रदेशातील रामपूर लोकसभा मतदारसंघातून जयाप्रदा यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज भरला. यावेळी झालेल्या सभेत आजम खान यांच्यावर आरोप करताना त्यांना रडू कोसळले.
जे कोणी त्यांच्याविरोधात जातात त्यांना जेलमध्ये टाकलं जातं. त्यामुळेच मी रामपूर सोडलं होतं, असं त्या म्हणाल्या आहेत.
मला जीवे मारण्याचाही प्रयत्न झाला, असा आरोपही त्यांनी केला आहे.
#WATCH: BJP candidate for #LokSabhaElections2019 from Rampur, Jaya Prada, breaks down while addressing a public rally; says, “Mai Rampur nahi chhodna chahti thi…Mai Rampur isliye chhod gayi, kyonki mujhe us din tezab se attack karne ke liye socha tha, mere upar hamla kiya tha” pic.twitter.com/HaWRRlHjq1
— ANI UP (@ANINewsUP) April 3, 2019
महत्वाच्या बातम्या-
–“मायावतींचे राजकारण म्हणजे 15 करोड द्या आणि तिकीट घ्या”
-निवडणूक होताच BSNL 54 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार?
–तिहार जेलच्या त्या कैद्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडाली- नरेंद्र मोदी
-आमची सत्ता आल्यास जुन्या नोटा बदलून देऊ; प्रकाश आंबेडकरांचं आश्वासन
-मोहन जोशींना उमेदवारी दिल्याने बापटांनी मानले काँग्रेसचे आभार
Comments are closed.