पाटणा | गुरूवारी नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मात्र ‘एनडीए’तला घटकपक्ष असलेला जेडीयूने सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. त्यावरून राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा होत आहेत. त्यावरच जेडीयूने प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही मंत्रीमंडळामध्ये सहभागी होणार नाही मात्र भाजपासोबत राहू, असं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटलं आहे.
भाजपवर आम्ही अजिबात नाराज नाही. त्यांच्यावर नाराज होण्याचा प्रश्न येतोच कुठे? असं जेडीयूने म्हटलं आहे. आवश्यक मान न दिल्याने जेडीयू भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा होत आहेत.
दरम्यान, भाजपने जी ऑफर आमच्यासमोर ठेवली होती ती आम्हाला अमान्य होती, बस्स एवढंच… असं म्हणत जेडीयूने अधिक काही बोलण्यास नकार दिला.
महत्वाच्या बातम्या
-‘या’ संघाला हरवणे सगळ्यात कठिण; ग्लेन मॅकग्राचा दावा
-“देशाचा विकास आणि प्रगतीसाठी नरेंद्र मोदींना साथ देऊ”
-…म्हणून मोदींच्या नव्या मंत्रीमंडळाची पहिलीच बैठक झाली रद्द
-लोकांनी दिल्या ‘जय श्री राम’च्या घोषणा; ममतांनी गाडीतून उतरून दिला दम
-विधानसभा धोरणांबाबत पुण्यात ‘वंचित’ची बैठक; काय झाली चर्चा???
Comments are closed.