मुंबई | हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीची सात दिवसांपासून सुरु असलेली मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. तिने आज खेरचा श्वास घेतला. यावर महाराष्ट्रभरातून उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या सर्व घटनेवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संतत्प प्रतिक्रिया दिली आहे.
हिंगणघाट घटना ही पुरोगामी महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा अपमान आहे. ज्या भूमीमध्ये जिजाई, रमाई आणि भिमाई जन्मली त्या भुमीमध्ये आज ही माझ्या भगिणीवर अत्याचार होतो, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
हा फक्त एका स्त्रीचा पराभव नाही तर महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीचा पराभव आहे, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
दरम्यान, लवकरात लवकर गुन्हा सिद्ध करून आरोपीला फासावर लटकवू, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
हिंगणघाट घटना ही पुरोगामी महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा अपमान आहे.ज्या भूमीमध्ये जिजाई,रमाई आणि भिमाई जन्मली त्या भुमीमध्ये आज ही माझ्या भगिणीवर अत्याचार होतो. हा फक्त एका स्त्रीचा पराभव नाही तर महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीचा परावभव आहे.@OfficeofUT @AnilDeshmukhNCP pic.twitter.com/G64SmS8yh9
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 10, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
ही घटना आपल्या सगळ्यांनाच मान खाली घालायला लावणारी- नितीन गडकरी
कागदपत्रं मागितली तर छाती दाखवू, मारा गोळी- असदुद्दीन औवेसी
महत्वाच्या बातम्या-
लवकरात लवकर आरोपीला फासावर लटकवू- उद्धव ठाकरे
अॅट्रॉसिटी प्रकरणात विनाचौकशी गुन्हा दाखल होणार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय
“आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ देऊ नये हीच खरी श्रद्धांजली”
Comments are closed.