“मुस्लिमांचे तळवे चाटतायेत, त्यांना खुश केलं जातंय आणि कातडी हिंदूंची सोलली जातेय”

Kalicharan Maharaj

Kalicharan Maharaj | विधानसभा निवडणुकीसाठी आज (18 नोव्हेंबर) प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राज्यभरात सध्या नेते-मंडळी तसेच स्टार प्रचारकांच्या सभा आणि रॅली गाजत आहेत. अशातच कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी केलेल्या एका वक्तव्याने राजकारणाचा पारा वाढला आहे. शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यासाठी रविवारी कालीचरण महाराज यांनी सभा घेतली. छत्रपती संभाजीनगर येथे ते बोलत होते. यावेळी त्यांनी हिंदू मतांबद्दल मोठं भाष्य केलंय.

हिंदू व्होट बँकांची क्रांती पाहिजे, असं म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म रक्षणासाठी राक्षस मारले, असं वक्तव्य कालीचरण महाराजांनी केलंय. यानंतर त्यांनी त्यांच्या आक्रमक भाषणाचा धडाका सुरू ठेवत थेट मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर टीकेची तोफ फिरवली.

“हिंदू मतदानच करत नाही, त्यामुळे मुस्लिम..”

कालीचरण महाराज यांनी जरांगे यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. आता एक आंदोलन सुरु झालं होतं माहिती आहे ना, हिंदू-हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं. कशी हवा होती त्या आंदोलनाची, लाखोंच्या संख्येने लोक मुंबईत आले होते. त्यांच्या नेत्यांनी थडग्यावर चादर चढवली. यामध्ये जातीपातीच्या आरक्षणाच्या काही गोष्टी नाहीत. यांचा नेता हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे राक्षस, अशा शब्दात कालीचरण महाराजांनी मनोज जरांगे यांना टार्गेट केलं. (Kalicharan Maharaj )

तसंच, हिंदू आणि मुस्लिम मतांबद्दलही त्यांनी मोठं भाष्य केलं. “मुस्लिमांना खुश करण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण ते मतदानात सहभागी होतात. मौलाना एकतर्फी मतदान करण्याचे आवाहन करतात. सर्व आमदार-खासदार मुस्लिमांचे तळवे चाटतात. मी तुम्हाला तुकडे टाकेल, मग लाडकी बहीण योजना, रोजगार देऊ, असे तुकडे टाकून तुम्हाला खुश ठेवू असं राजकीय पक्ष करतात. फुकटात वापरणाऱ्या लोकामध्ये सर्वात जास्त मुस्लिम आहेत आणि कातडी मात्र हिंदूंची सोलली जाते.”,असं कालीचरण महाराज सभेत म्हणाले.

हिंदूंचं हित पाहणाऱ्यांनाच मत द्या-

तसेच, जो हिंदू हितकी बात करेंगा त्यालाच मतदान करा असं आवाहन देखील कालीचरण महाराज यांनी सभेत उपस्थित मतदारांना केलं. जेवढे मुसलमान एरिया आहे तिथे पाकिस्तान बनलं आहे. जागोजागी पाकिस्तान बनला आहे. त्यामुळे 100 टक्के अहिंसा शक्य नाही. हिंसा करावीच लागते, असं म्हणत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील धर्म रक्षणासाठी राक्षस मारले, असं कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) म्हणाले.

हिंदू लोक मतदानालाच जात नाही, मग राजा कोण येणार, तर मुसलमानाचे पाय चाटणारा…हिंदू मतदान करतील तर हिंदू कट्टर राजा बसेल, असंही कालीचरण महाराज म्हणाले आहेत.

News Title : Kalicharan Maharaj Big Statement on Hindu Vote

महत्वाच्या बातम्या –

‘मनोज जरांगे राक्षस…’; कालीचरण महाराजांची दातओठ खात सणसणीत टीका

धक्कादायक! अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार

शेकोट्या पेटल्या, राज्यात थंडीचा जोर आणखी वाढणार?; IMD चा महत्वाचा अंदाज

“या नेत्यानी मुलाच्या लग्नाचा खर्च सरकारी तिजोरीतून केला” ठाकरेंच्या आरोपावर प्रतिउत्तर

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी आहे की नाही?

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .