Kalicharan Maharaj | राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभेला मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजला. महायुतीला याचा चांगलाच फटका बसला. त्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा लढवण्याची घोषणा केली होती. मात्र, नंतर त्यांनी अचानक माघार घेतली. राज्यात निवडणुकीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. तर, आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. अशात शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांची प्रचारसभा चर्चेत आली आहे. कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी संजय शिरसाट यांच्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मनोज जरांगे यांना अप्रत्यक्ष टोला
यावेळी कालीचरण महाराजांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांना आक्रमक भाषेत टार्गेट केलं. कालीचरण महाराज यांनी जरांगे यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. आता एक आंदोलन सुरु झालं होतं माहिती आहे ना, हिंदू-हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं. कशी हवा होती त्या आंदोलनाची, लाखोंच्या संख्येने लोक मुंबईत आले होते. त्यांच्या नेत्यांनी थडग्यावर चादर चढवली. यामध्ये जातीपातीच्या आरक्षणाच्या काही गोष्टी नाहीत. यांचा नेता हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे राक्षस, अशा शब्दात कालीचरण महाराजांनी मनोज जरांगे यांना टार्गेट केलं.
हिंदू मतांबाबतही त्यांनी मोठं भाष्य केलं. हिंदू व्होट बँकांची क्रांती पाहिजे, असं म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म रक्षणासाठी राक्षस मारले, असं वक्तव्य कालीचरण महाराजांनी केलंय. यानंतर त्यांनी त्यांच्या आक्रमक भाषणाचा धडाका सुरूच ठेवला. हिंदू मतदानाला जात नाही, त्यामुळे मुस्लिम धार्जिणे लोक राजा बनत असल्याचं कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) म्हणाले.
“..त्यामुळे सर्व देव देवी हिंसक आहेत”
“मुस्लिमांना खुश करण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण ते मतदानात सहभागी होतात. मौलाना एकतर्फी मतदान करण्याचे आवाहन करतात. सर्व आमदार-खासदार मुस्लिमांचे तळवे चाटतात. मी तुम्हाला तुकडे टाकेल, मग लाडकी बहीण योजना, रोजगार देऊ, असे तुकडे टाकून तुम्हाला खुश ठेवू असं राजकीय पक्ष करतात. फुकटात वापरणाऱ्या लोकामध्ये सर्वात जास्त मुस्लिम आहेत आणि कातडी सोलली जाते त्यात हिंदूच असतात.”, असं कालीचरण महाराज सभेत म्हणाले.
पुढे कालीचरण महाराज यांनी मतदारांना मोठं आवाहन देखील केलं. जो हिंदू हितकी बात करेंगा त्यालाच मतदान करा. जेवढे मुसलमान एरिया आहे तिथे पाकिस्तान बनलं आहे. जागोजागी पाकिस्तान बनला आहे. त्यामुळे 100 टक्के अहिंसा शक्य नाही. हिंसा करावीच लागते. त्यामुळे सर्व देव देवी हिंसक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील धर्म रक्षणासाठी राक्षस मारले,असं कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) म्हणाले.
News Title : Kalicharan Maharaj target manoj jarange
महत्वाच्या बातम्या –
धक्कादायक! अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार
शेकोट्या पेटल्या, राज्यात थंडीचा जोर आणखी वाढणार?; IMD चा महत्वाचा अंदाज
“या नेत्यानी मुलाच्या लग्नाचा खर्च सरकारी तिजोरीतून केला” ठाकरेंच्या आरोपावर प्रतिउत्तर
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी आहे की नाही?
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री..; ‘या’ नेत्याचा मोठा दावा