मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गमध्ये करण्यात येणार असल्याची घोषणा केली. यानंतर अभिनेत्री कंगणा राणावत हिने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
कंगणा तिच्या ट्विटमध्ये म्हणते, काही फॅन्सी कार्यकर्त्यांची समस्या ही सर्व मुंबईकरांची समस्या असू शकत नाही. मी देखील एक लाखांपेक्षा अधिक रोपंटी लावलीयेत. वृक्षतोड अयोग्यच आहे, पण काही मोजक्या श्रीमंत लोकांसाठी शहराचा विकास थांबवणं हे सुद्धा योग्य नाही.
या ट्विटमधून कंगणाने मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारला टोला लगावला आहे. सध्या कंगणाचं हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे.
महत्वाच्या बातम्या-
…तर दिवाळीनंतरही शाळा सुरू करणं अशक्य- बच्चू कडू
“कोणताही धर्म आणि देव सणांसाठी जीव धोक्यात टाकायला सांगत नाही”
“आरेतील कारशेडचं ठिकाण बदलण्याचा निर्णय अहंकारातून”
तेवतिया आणि वॉर्नरमध्ये नेमकं काय झालं?; सोशल मीडियावर ‘हा’ व्हिडीओ व्हायरल