मुंबई | काही राजकीय पक्षांना ऊत आला आहे. ते गर्दी जमवून आंदोलन करत आहेत. मात्र हे टाळलं पाहिजे. विनाकारण लोकांचा जीव धोक्यात टाकू नका, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय.
मुंबईकरांनी अजून काळजी घेतली पाहिजे. जे नियम आहेत ते पाळले पाहिजे. राजकीय पक्ष गर्दी जमवून आंदोलन करत आहेत. हे थोडं टाळलं पाहिजे, असा सल्ला किशोरी पेडणेकरांनी दिलाय.
जे नियम आहेत ते पाळले पाहिजे. काही राजकीय पक्षांना ऊत आला आहे. ते गर्दी जमवून आदोलन करत आहेत.अजूनही कोरोनाचं संकट टळलेलं नाही, असं किशोरी पेडणेकरांनी सांगितलं.
मुंबईत दिवाळीनंतर गर्दी वाढली होती. सर्व काही अनलॉक झालं होतं. मंदिर खुली करण्यात आली होती. त्यामुळे आकड्यात बदल होईल याची आम्हाला माहिती होती, असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्यात.
महत्वाच्या बातम्या-
“शिवसेना आणि राष्ट्रवादीनेच नितीन राऊतांचा गेम केला”
पंजाब-हरयाणातील शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक देणं दुर्दैवी- संजय राऊत
शेतकरी पाकिस्तानी नाहीत, केंद्रानं त्यांचं ऐकावं- अण्णा हजारे
“खासदार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बाहेरून आलेलं म्हणणं ही शोकांतिका”
दुसऱ्या वनडे सामन्यातही ऑस्ट्रेलियाकडून भारताचा धुव्वा; टीम इंडियाने मालिकाही गमावली