Maharashtra l महागाईने त्रस्त झालेल्या कोल्हापूरकरांच्या (Kolhapur) खिशाला आणखी झळ बसणार आहे. कोल्हापुरात रिक्षा प्रवास महागला असून, आजपासून पहिल्या टप्प्यासाठी ३ रुपयांची भाडेवाढ करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या (Regional Transport Authority) बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
रिक्षाच्या किमतीत वाढ, सुट्या भागांचे चढे भाव आणि इंधन दरात (Fuel Price) झालेली वाढ यामुळे रिक्षाचालक आर्थिक संकटात सापडले होते. त्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असला, तरी सर्वसामान्य नागरिकांवरील आर्थिक भार वाढणार आहे.
खटुआ समितीच्या शिफारशीनुसार निर्णय :
रिक्षा भाडेवाढीसंदर्भात खटुआ समितीने (Khatua Committee) केलेल्या शिफारशींनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी २०११ मध्ये रिक्षा भाडेवाढ करण्यात आली होती. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (Regional Transport Office) सादर केलेल्या प्रस्तावावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील प्राधिकरणाच्या बैठकीत सखोल चर्चा झाली. रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींची मतेही विचारात घेण्यात आली.
भाडेवाढीच्या निर्णयासह, रिक्षाचालकांना रिक्षाचे मीटर कॅलिब्रेशन (Meter Calibration) करून घेणे बंधनकारक आहे. १ ते ३१ मार्च दरम्यान कॅलिब्रेशनसाठी मुदत देण्यात आली आहे. मुदतीत मीटर कॅलिब्रेशन न केल्यास रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
Maharashtra l आजपासून नवीन दर लागू :
कोल्हापुरात तीन आसनी रिक्षांसाठी आजपासून नवीन दर लागू होणार आहेत. सध्याचा किमान दर २२ रुपये असून तो आता २५ रुपये झाला आहे. मध्यरात्री १२ ते ५ या वेळेत किमान भाडेवाढीच्या दराच्या २५ टक्के, तर ग्रामीण भागात ४० टक्के अधिक दर आकारला जाईल. जिल्हाधिकारी अमोल येडगे (Amol Yedge) आणि जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित (Mahendra Pandit) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.