कोल्हापूर | सांगली-कोल्हापूरच्या पूरामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांचं नुकसान झालं आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन शाहू महाराजांची नगरी ‘करवीरनगरी’ अर्थात कोल्हापुरातील मुस्लीम समाजाने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सोमवारी असलेल्या बकरी ईदला बकरी न कापता ते पूरग्रस्तांना आर्थिक मदत देणार आहेत.
शेतकरीवर्गाचे हाल झालेले आहेत, मुक्या प्राण्यांची वाताहात झालेली आहे. लाखो लोक बेघर झालेले आहेत. पूरग्रस्तांच्या अडचणी या पूर ओसरल्यानंतर अधिकच वाढणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने मदतीचे आवाहन केले होते. लोकांनीही या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे.
पैगंबर मोहम्मद यांनी म्हटले आहे की आपल्या शेजारच्या घरात जर अन्न शिजत नसेल व तर आपले घरातील अन्न हे पहिल्यादा त्या घरात दिले पाहिजे…तो कोणत्याही धर्माचा वा जातीचा असू दे…तर चला आपण आपल्या बांधवाची मदत करू, अशा आशचायं पत्रक मुस्लिम समाजाने काढलं आहे.
दरम्यान, मुस्लिम समाजाने घेतलेल्या निर्णयाचं राज्यभरातून कौतुक होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“जनतेला कोरडी सहानुभूती दाखवायची नव्हती, म्हणून मी पूरग्रस्त भागात गेलो नाही”
-कोण काय करतो आम्हाला माहित नाही…. आमची लोकं काम करतात- उद्धव ठाकरे
-“राष्ट्रीय आपत्तीच्या शब्दात अडकण्याची मला आवश्यकता वाटत नाही”
-महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसच्या ‘या’ माजी मंत्र्याची मागणी
-संकटकाळी निवडणुकांचा विचार डोक्यात कसा येतो?; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला
Comments are closed.