मोठी बातमी!, कुंभमेळ्यातील मृतांचा धक्कादायक आकडा समोर

Mahakumbh Mela | प्रयागराज महाकुंभमेळा, जो या पृथ्वीवरील सर्वात मोठा धार्मिक सोहळा आहे, तेथे एका दुर्घटनेत 14 भाविकांचा मृत्यू झाला आहे तर 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. 40 कोटी लोक या महामेळाव्यात यंदा शाही स्नान करतील अशी आकडेवारी जारी झाली होती. अमेरिकेची लोकसंख्या 34 कोटी इतकी आहे.

यावरून तुम्हाला अंदाज येऊ शकतो की महाकुंभ मेळाव्याला (Mahakumbh Mela) सर्वात पवित्र स्नानाचा दिवस असलेल्या मौनी अमावस्येला किती लोक जमले असतील. या मंगळवारी रात्री संगम घाटाकडे निघालेला जत्था सर्व बॅरिकेट्स तोडून अनेकांना तुडवत पुढे गेल्याने अनेकांचे मृत्यू झाले आहेत. गर्दीच्या मानसशास्त्रानुसार जो तो आपला स्वतःचा जीव वाचवायला जातो. या दुर्घटनेत मागून एवढा प्रेशर होता की पुढे जाणेच त्यांच्या हातात होते आणि मग व्हायचे तेच झाले.

मौनी अमावस्येचे शाही स्नान आणि चेंगराचेंगरीचा इतिहास

महाकुंभमध्ये (Mahakumbh Mela) आज (29 जानेवारी) मौनी अमावस्येचे महाशाही स्नान होते. या कारणाने येथे जवळपास 5 कोटी श्रद्धाळू जमले होते. अमृतस्नानामुळे सर्व तरंगते पूल बंद केले होते. त्यामुळे ज्याला त्याला गंगेत डुबकी मारायची होती. त्यामुळे गर्दी नियंत्रणाबाहेर गेली.

बॅरिकेट्समध्ये अडकून काही लोक पडले आणि अफवा पसरून गर्दी सगळ्यांना तुडवत पुढे गेली आणि अपघात घडला. कुंभ मेळाव्याच्या ठिकाणी मौनी अमावस्येला चेंगराचेंगरी झाल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येला चेंगराचेंगरी होऊन 800 जण ठार झाले होते.

3 फेब्रुवारी 1954 ची ती काळरात्र

तारीख होती 3 फेब्रुवारी 1954. स्थळ प्रयागराज. मौनी अमावस्येच्या पवित्र स्नानासाठी लाखो श्रद्धाळू अमृत स्नान करण्यासाठी पोहोचले होते. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या कुंभ मेळ्यात (Mahakumbh Mela) तेव्हा चेंगराचेंगरीला एक घटना कारणीभूत ठरली होती. एक हत्ती नियंत्रणाबाहेर गेल्याने जीव वाचविण्यासाठी लोक इकडे तिकडे पळू लागले. परिस्थिती एवढी बिघडली की चेंगराचेंगरी झाली, सर्वत्र अफरातफर माजली.

लोक किंचाळत होते. सगळीकडे आक्रोश पसरला होता. या घटनेत 800 लोकांचा प्राण गेल्याने हत्तींवर नंतर बंदी घालण्यात आली. कुंभ मेळ्यात हत्तींच्या प्रवेशावर निर्बंध लादले ते कायमचे झाले. अनेक मीडियातील बातम्यांनुसार तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या आगमनाने गर्दी वाढल्याचे म्हटले जाते.

त्यांच्यासाठी केलेल्या संरक्षक उपाययोजनांमुळे कुंभच्या सुरक्षेवर परिणाम झाल्याचे म्हटले जात आहे. माध्यमांच्या माहितीनुसार पंडित जवाहरलाल नेहरूंनी कुंभ मेळ्याच्या आयोजनाची स्थितीची पाहणी एक दिवस आधीच केलेली होती. त्यामुळे घटनेच्या वेळी ते तेथे उपस्थित नव्हते असे म्हटले आहे.

दुर्घटनांनंतरच्या उपाययोजना-

या दुर्घटनेनंतर सरकारने धडा घेतला आणि धार्मिक समारंभासाठी आपली रणनीती बदलली. कुंभ मेळ्यात प्रत्येक क्षणाची माहिती देण्यासाठी लाऊडस्पीकर लावण्याची सुरुवात केली. लाईटच्या व्यवस्थेवर देखील खास लक्ष ठेवण्यात आले. 1954 च्या दुर्घटनेनंतर पंडित नेहरूंनी गर्दी टाळण्यासाठी कुंभ मेळा सारख्या प्रमुख स्थळांवर व्हीआयपींच्या दौऱ्यांवर बंदीच घातली.

News Title : mahakumbh mela shocking number of deaths