Maharashtra l राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. अशातच आज एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. परंतुआता महायुतीकडून मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवली आहे.
शपथविधी कधी पार पडणार :
यावेळी मुख्यमंत्र्यांसोबतच भाजपचे 10 आमदार, शिवसेना शिंदे गट 6 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची देखील सर्वत्र चर्चा रंगली आहे. मात्र आता राज्य सरकारचा नवा शपथविधी कधी पार पडणार याची तारीख देखील समोर आली आहे.
यासंदर्भात भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी कधी पार पडणार याबद्दल माहिती दिली आहे. येत्या 30 तारखेला नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार असल्याचं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.
Maharashtra l 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार :
महायुतीमधील भाजपसह इतर पक्षांचे नेते व कार्यकर्ते यांना त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असे वाटत आहे. परंतु, आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री का होऊ नये अशी प्रत्येक पक्षाची देखील भावना असते. त्यामुळे सर्वजण मुख्यमंत्री पदाची मागणी करत आहेत. तसेच एकनाथ शिंदे हे महायुतीत नाराज असल्याच्या अफवा असल्याचं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.
तसेच मुख्यमंत्रिपदाचा आणि मंत्रिपदाचा फॉर्म्युला देखील एकत्रित बसून ठरवला जाईल असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. सर्वात विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांसोबत महायुतीतील 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं बोललं जात आहे.
News Title – Maharashtra Government Formation Date
महत्वाच्या बातम्या-
आधारकार्ड संदर्भात महत्वाची माहिती; नागरिकांना होणार फायदाच फायदा
“तो माझं तोंड बंद…”, लग्नाच्या पाच महिन्यानंतर पती जहीरबद्दल सोनाक्षीचा गौप्यस्फोट!
राजकारणात मोठा ट्विस्ट, भाजपकडून मास्टरप्लॅन, एकनाथ शिंदेंना मोठी जबाबदारी मिळणार?
मतमोजणीत झालायं मोठा घोळ; आव्हाडांनी सादर केली धक्कादायक आकडेवारी
फडणवीसांना मुख्यमंत्री करणं भाजपला पडणार भारी?, ‘या’ 3 गोष्टींनी चिंता वाढवली