Crop Insurance GR | महाराष्ट्र सरकारने सुधारित पीक विमा योजना (Pik Vima Yojana) लागू करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भातील शासन निर्णय (GR) अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. २०२५-२६ च्या खरीप हंगामापासून या योजनेची अंमलबजावणी होणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांकडून निश्चित हिस्सा आकारण्यात येणार असून, आधीच्या १ रुपयातील योजनेत बदल करण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांकडून किती हिस्सा? :
खरीप हंगामासाठी: २%
रब्बी हंगामासाठी: १.५%
नगदी पिकांसाठी: ५%
उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकार मिळून भरतील.
Crop Insurance GR | ‘कप अँड कॅप मॉडेल’ लागू :
नवीन सुधारित योजनेत “Cup & Cap Model (80:110)” अंतर्गत विमा भरपाईचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. पिकांचे संरक्षण पेरणीपासून ते काढणीपर्यंत करण्यात येणार आहे. यामध्ये नैसर्गिक आपत्तींपासून होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण दिले जाणार आहे.
२०१६ पासून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना (Pik Vima Yojana) राबवली जात होती. २०२३ मध्ये ‘१ रुपयात विमा योजना’ सुरु करण्यात आली होती. मात्र, योजनेच्या अंमलबजावणीत गैरप्रकार आणि आर्थिक बोजा वाढल्याने सरकारने नवीन धोरण स्वीकारले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली २० मार्च २०२५ रोजी झालेल्या बैठकीत या बदलांना मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर २९ एप्रिलच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर अंतिम निर्णय घेण्यात आला.