Fisheries in Maharashtra l पुण्यात मत्स्य व्यवसायाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर आज बैठक पार पडली असून, यामध्ये अनेक क्रांतिकारी निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी गोड्या पाण्यातील तलावांतील मासेमारी, उत्पादन वाढ आणि तंत्रज्ञान वापरासंदर्भात नवे निर्णय जाहीर केले आहेत.
पुण्यात मोठे मत्स्यालय आणि AI तंत्रज्ञानाची अंमलबजावणी :
आज पार पडलेल्या बैठकीत गाळ कसा काढायचा, मासेमारीत उत्पादन कसे वाढवायचे यावर चर्चा झाली. पुण्यात एक भव्य मत्स्यालय उभारण्याचे ठरवले असून, हडपसर येथे त्यासाठी जागा निश्चित करण्यात आल्याचे नितेश राणे (Nitesh Rane) यांनी स्पष्ट केले. (Fisheries in Maharashtra)
मत्स्य व्यवसायात आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून, यामुळे उत्पादन क्षमता वाढवण्यास मदत होणार आहे. बंदर खात्याच्या अपयशांवर उपाययोजना आखण्यात येणार असून, राज्यात उद्योग उभारण्यासाठी रचना तयार केली जात आहे.
Fisheries in Maharashtra l मत्स्य उत्पादनातील घट आणि सुधारण्याचे प्रयत्न :
राज्यातील मत्स्य उत्पादनात सध्या घट झाल्याचे निरीक्षणात आले आहे. सांगली आणि कोल्हापूरसारख्या जिल्ह्यांमध्ये उत्पादन कमी असून, सातारा जिल्ह्यात स्थिती समाधानकारक आहे. पुण्यात मागील वर्षाच्या तुलनेत उत्पादन घटले असून, उजनी धरण परिसरातील जलप्रदूषणामुळेही परिणाम झाला आहे.
या पार्श्वभूमीवर जलसंपदा खात्याकडून मत्स्य खात्याकडे नियंत्रण आणण्याचे नियोजन सुरू आहे. दूषित पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर कारवाई सुरू असून, मत्स्य शेती करणाऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा, नुकसानभरपाईची तयारी :
नुकत्याच पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतीप्रमाणेच मत्स्य व्यवसायिकांनाही नुकसानभरपाई मिळणार आहे. मत्स्य खाते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या पुढाकारामुळे हा महत्त्वाचा निर्णय अमलात येणार असून, राज्यातील हजारो मत्स्य उद्योजकांना याचा थेट लाभ होईल.