Maharashtra Vidhan Sabha | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी काल 20 नोव्हेंबररोजी राज्यात मतदान पार पडले. आता 23 तारखेला राजकीय नेत्यांचे भवितव्य ठरेल. या दिवशी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे राज्यात कुणाची सरकार स्थापन होणार, याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे. लोकसभेला राज्यात महाविकास आघाडीने बाजी मारली. तर, महायुतीला चांगलाच फटका बसला. महायुतीच्या पराभवामागे जरांगे फॅक्टर हे मोठं कारण असल्याचं म्हटलं गेलं. (Maharashtra Vidhan Sabha)
बीडसह अनेक ठिकाणी लोकसभेत जरांगे फॅक्टर चांगलाच गाजला. त्यामुळे विधानसभेतही मराठा कार्ड गेम करणार काय?, यावर बोललं जातंय. काल मतदान पार पडल्यानंतर विविध माध्यम संस्थांच्या एक्झिट पोल्सची आकडेवारी जाहीर होत आहे. अशाच एका एक्झिट पोलमध्ये यंदा विधानसभेत जरांगे फॅक्टर चालणार की फेल ठरणार, याबाबत मोठा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो?
एका प्रसिद्ध एक्झिट पोलनुसार भाजपला राज्यात 77 ते 108 जागा, शिवसेना शिंदे गटाला 27 ते 50 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 18 ते 28 जागा मिळण्याची शक्यता आहे. महायुतीला एकत्रित एकूण 122 ते 186 जागा मिळणार, असा अंदाज आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये कॉँग्रेसला 28 ते 47, शिवसेना ठाकरे गटाला 16 ते 35 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 25 ते 39 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Maharashtra Vidhan Sabha)
तसेच, विधानसभेत जरांगे फॅक्टरचा प्रभाव काम करणार नसल्याचा अंदाजही सांगण्यात आलाय. जरांगे यांनी विधानसभा लढण्याची घोषणा केली होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी माघार घेतली. तसेच गेल्या काही दिवसांत जरांगे यांनी भाजप आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यातच मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष देखील निर्माण झाला आहे.
जरांगे फॅक्टरचा प्रभाव काम करणार की नाही?
या सर्व गोष्टींचा भाजपला निवडणुकीत फटका बसणार असे मानले जात होते, पण एक्झिट पोलच्या आकडेवारीने हे खोटे ठरवले आहे. अनेक एक्झिट पोलच्या आकडेवारीमध्ये महायुतीचे पारडे जड असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टरचा प्रभाव काम करणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. (Maharashtra Vidhan Sabha)
दरम्यान, काल राज्यभरात मतदान पार पडले. आता 23 नोव्हेंबररोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यापूर्वीच अनेक माध्यम संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. त्यात काही ठिकाणी महाविकास आघाडी तर काही ठिकाणी महायुती बाजी मारणार, असे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. मात्र, हे चित्र कितपत खरे ठरणार आणि राज्यात कुणाची सत्ता येणार ते आता थेट 23 तारखेलाच स्पष्ट होणार आहे.
News Title – Maharashtra Vidhan Sabha Jarange Factor
महत्त्वाच्या बातम्या-
‘सुशीलकुमार व प्रणिती शिंदे भाजपची बी टीम’; सोलापुरात ठाकरे गटाचा संताप
भाजपला बसणार धक्का, ‘इतक्या’ जागा मिळणंही कठीण?; एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज
आज वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग, देवी लक्ष्मी कुणाच्या इच्छा पूर्ण करणार?
परळीत जोरदार राडा, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण
राज्यात पुन्हा खळबळ! निवडणुकीच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप