Maharashtra Weather | फेंगल वादळामुळे मागच्या आठवड्यात राज्यातील बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला. कोकण, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मागच्या आठवड्यात थंडी जणू गायबच झाली होती. या वादळाचा प्रभाव आता पूर्णपणे नाहीसा झाला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा थंडीची लाट उसळली आहे. उत्तर, मध्य महाराष्ट्रात तर रक्त गोठवणारी थंडी पडली आहे. (Maharashtra Weather )
मंगळवारी मुंबईसह नाशिक, जळगाव, नंदूरबार जिल्ह्यात तापमान घसरले आहे. नाशिकमध्ये मंगळवारी 9.4 अंश तापमानाची नोंद झाली. किमान तापमानात साधारण 4 अंश सेल्सियसची घट झाल्याने नाशिक गारठले. थंडीचा जोर वाढल्याने नाशिक जिल्ह्यातील शाळांच्या वेळात मोठा बदल करण्यात आला आहे.
नाशिकमध्ये शाळांच्या वेळात बदल
थंडीचा कडाका वाढत असल्याने नाशकातील मनपा हद्दीतील शाळा एक तास उशिरा भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका शिक्षण विभागाने हा निर्णय जाहीर केलाय. त्यामुळे येथील मनपा शाळा आता 7 ऐवजी 8 वाजता भरणार आहेत.तसेच, खासगी शाळा या 8 ऐवजी 9 वाजता भरतील. (Maharashtra Weather )
कडाक्याच्या थंडीमुळे शाळकरी मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात आता सर्व शाळा या एक तास उशिराने भरतील. राज्यातील इतर जिल्ह्यात देखील थंडीने कहर केलाय. उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला असून नागरिक रस्त्यावर ठिकठिकाणी शेकोट्या पेटवत आहेत.
पुढील 5 दिवस थंडीचे
हवामान विभागाने उत्तरेकडील राज्यांमध्ये 10 डिसेंबर ते 14 डिसेंबर पर्यंत थंडीची लाट राहणार असल्याचा इशारा दिला आहे. जम्मू काश्मीर , उत्तर प्रदेश , राजस्थान , मध्य प्रदेश या राज्यांमध्ये थंडीची लाट राहणार असून कोरडे थंड वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. यामुळेच उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडी वाढली आहे. (Maharashtra Weather )
राज्यातील जळगाव जिल्ह्यात नीचांकी 8 अंशांची नोंद करण्यात आली . तर कमाल तापमान रत्नागिरीत सर्वाधिक 34.5 अंश होते. निफाडमध्ये देखील आज 8.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत देखील थंडी वाढली आहे.पुढील 5 दिवस हे राज्यात थंडीचे असणार आहेत, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.
News Title – Maharashtra Weather School timings change in Nashik
महत्वाच्या बातम्या-
मंत्रीपदासाठी इच्छुक व नाराजांसाठी एकनाथ शिंदे वापरणार ‘हा’ पॅटर्न?, चर्चेला उधाण
“माझं डोकं पिसाळलं तर…”; मनोज जरांगे संतापले, पण कुणावर?
मोक्षदा एकादशीला भगवान विष्णू व लक्ष्मी ‘या’ राशींवर ठेवणार कृपादृष्टी!
भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी!
मंत्रिमंडळात कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार? उदय सामंतांनी दिल उत्तर