Weather Updates l दिवाळीचा सण अगदी थाटामाटात पार पडला आहे. अशातच आता नोव्हेंबर महिन्यात ऑक्टोबर हिटचा प्रभाव देखील जाणवत आहे. तसेच राज्याच्या काही भागात अजूनही अवकाळी पावसाच संकट कायम आहे. अशा परिस्थितीत थंडीची चाहुल कधी लागणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
दिवाळीत फटाक्यांमुळे वातावरण दूषित :
दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले आहेत. मात्र या फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे वातावरण देखील दूषित झाले आहे. तसेच या प्रदूषित हवेमुळे मुंबई आणि पुण्यात हवेच्या गुणवत्तेची पातळी देखील मोठ्या प्रमाणात खालावली आहे. मात्र या सगळ्याचा परिणाम हा हवामानावर होताना दिसत आहे.
मात्र हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकणात पावसाची दाट शक्यता आहे. अशातच आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. तसेच काही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे. याशिवाय काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Weather Updates l थंडीची चाहुल कधी लागणार? :
अशातच आता राज्यात सध्या हिवाळ्याची चाहूल देखील लागली आहे. बहुतांश जिल्ह्यातील कमाल तापमान हे 33 अंश सेल्सियस आहे तर किमान तापमान हे 22 अंश सेल्सियसवर पोहोचलं आहे. मात्र येत्या काही दिवसांत राज्यात थंडीचे प्रमाण देखील वाढणार आहे.
तसेच आता कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची दाट शक्यता वर्तवली आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, नाशिक या जिल्ह्यात वादळ आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
News Title – Maharashtra Weather Updates
महत्त्वाच्या बातम्या-
मनोज जरांगेंच्या निर्णयावर लक्ष्मण हाकेंची खरपूस प्रतिक्रिया; म्हणाले…
HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस बंद राहणार!
जरांगेंनी माघार घेण्याचं कारण सांगितलं; म्हणाले, “उमेदवार पडला तर जातीचं हसू..”
ब्रेकिंग! मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार, अचानक का घेतला निर्णय?
दिवाळीच्या फराळातून पैसे वाटप; सांगलीत शरद पवारांचा उमेदवार अडचणीत?