महाविकास आघाडीने जनतेला दिली पाच प्रमुख आश्वासनं? वाचा सविस्तर

Mahavikas Aaghadi

Mahavikas Aaghadi l मुंबईतल्या बीकेसी या ठिकाणी महाविकास आघाडीची सभा पार पडली. या सभेतून महाविकास आघाडीने महाराष्ट्राला पाच प्रमुख आश्वासनं दिली आहेत. तसेच या सभेत राहुल गांधी, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार या प्रमुख नेत्यांसह नाना पटोले यांनी देखील भाषण केलं आहे.तर ते नेमकी काय आहेत हे आपण सविस्तर जाणून घेऊयात…

Mahavikas Aaghadi l माविआच्या पाच प्रमुख घोषणा नेमक्या काय? :

– राज्यात महालक्ष्मी योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला तब्बल 3000 रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास लागू करणार असल्याचा वादा माविआने दिला आहे.

– याशिवाय राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ करणार. तसेच नियमित कर्जफेडीसाठी देखील 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन देणार असल्याचा वादा माविआने दिला आहे.

– जातनिहाय जनगणना करणार, 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा वादा माविआने दिला आहे.

– राज्यातील 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधे दिली जाणार असल्याचा वादा माविआने दिला आहे.

– तसेच बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4000 रुपयांपर्यंत मदत दिली जाणार असल्याचा वादा माविआने दिला आहे.

News Title – Mahavikas aghadi five big promises to maharashtra

महत्त्वाच्या बातम्या-

शरद पवारांवर केलेल्या वक्तव्याबद्दल सदाभाऊ खोत यांची जाहीर माफी; म्हणाले..

उद्धव ठाकरेंना धक्का, लोकसभेला उमेदवारी दिलेल्या ‘या’ नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

दरवाढीचं सत्र सुरूच, सोनं पुन्हा महागलं; जाणून घ्या आजच्या किमती

‘…नाहीतर बुक्कीत टेंगूळ निघेल’; रूपाली ठोंबरेंचा सदाभाऊ खोतांना इशारा

आज देवी लक्ष्मीच्या कृपेने कोणत्या राशी होणार धनवान?, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .