“महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांपेक्षा बेवड्यांची चिंता जास्त”
मुंबई | सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये नेहमीच कलगितुरा रंगल्याचं पहायला मिळत असतो. अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारला शेतकऱ्यांपेक्षा जास्त बेवड्यांची चिंता असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.
राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला (Mahavikas Aghadi) शेतकऱ्यांपेक्षा बेवड्यांची चिंता जास्त आहे, या सरकारने विदेशी दारूवरचा कर कमी केला पण वीजबील माफ केलं नाही, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
मोदी सरकारने मोठ्या प्रमाणात धान्य राज्य सरकारला दिलं होतं. पण मोदींचे नाव होईल म्हणून या सरकारने ते धान्य गोदामात सडवलं पण गरिबांपर्यंत पोहोचवलं नाही, असा खोचक टोलाही फडणवीसांनी लगावला आहे.
दरम्यान, सामान्यांना धोका देणाऱ्या सरकारला वठणीवर आणणार. 2024 साली राज्यात भाजप एकहाती सत्ता प्राप्त करणार, असंही फडणवीसांनी म्हटलं.
थोडक्यात बातम्या –
प्रवीण दरेकरांची पोलिसांकडून तीन तास चौकशी, बाहेर येताच दरेकरांचा सरकारवर हल्लाबोल
“मनसे बिनबुडाची झालीये, तिला बुडही नाही आणि शेंडाही नाही”
“न्यायालयाने भोंगे खाली उतरावायचे आदेश दिले आहेत त्याचं पालन करा आणि मग…”
अभिनेत्री सोनम कपूरचे बेबी बंप फ्लाॅन्ट करताना फोटो व्हायरल, पाहा फोटो
कडाक्याच्या उन्हात अवकाळी पावसाचं सावट, पुढील 4,5 दिवस महत्त्वाचे
Comments are closed.