Maharashtra Election 2024 | महाराष्ट्राची जनता ज्या गोष्टीची वाट पाहत होती अखेर तो दिवस आला. महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुती सरकारने कमबॅक केलं आहे. राज्याच्या राजकारणातील ऐतिहासिक दिवस म्हणून आजच्या (23 नोव्हेंबर) म्हणून पाहिलं जात आहे.
जनते समोर आलेल्या निकालानंतर, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत येत्या सोमवारी किंवा मंगळवारी मंत्रीमंडळाचा शपथविधी केला जाणार आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचा विजय झाला असता, परंतु अशी काही कारणं सोमर आली आहे, ज्यामुळे महाविकास आघाडीचा (mahavikas aghadi) पराभाव झाला.
पराभवाची कारणं कोणती?
महाराष्ट्रात महाविकास आघाडीची (mahavikas aghadi) अशी अवस्था होण्यामागे वेगवेगळी कारणं असली, तरी प्रमुख कारण आहे, नकारात्मक प्रचार, महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहिण योजना, ज्येष्ठांसाठी, युवकांसाठी स्टायपेड अशा वेगवेगळ्या योजना आणल्या.
शेतकऱ्यांना वीज बिल माफी दिली, त्याचा मतदारांवर परिणाम झाला हे खरं आहे. पण महायुतीच सरकार हटवल्यानंतर महाराष्ट्राच्या विकासासाठी काय प्लान आहे? पर्यायी योजना काय आहेत? हे मतदार राजाला पटवून देता आलेलं नाही.
‘या’ कारणामुळे महायुतीचा विजय झाला-
मविआने फक्त महायुती सरकारवर टीका करण्यात जास्त शक्ती खर्च घातली. या उलट महायुतीने बटेंगे तो कटेंग, एक हैं तो सेफ हैं असे मुद्दे प्रचारात आणले. पण महाराष्ट्राचा विकास कसा केला हे सुद्धा ते सांगत होते. महाविकास आघाडीला मात्र, महाराष्ट्राचा विकास कसा करणार? हे सांगता आलं नाही. जागा वाटपावरुन तसेच मुख्यमंत्री पदावरुन मविआमध्ये मतभेद दिसून आले. महायुतीने मात्र लोकसभेतील पराभवातून धडा घेत चूका सुधारल्या. म्हणूनच महायुती जिंकली.
News Title : mahavikas aghadi lost in vidhansabha election reasons
महत्त्वाच्या बातम्या-
‘बाप बाप होता है’; विजयानंतर धर्मरावबाबा आत्रामांनी लेकीला सुनावलं
लातूर शहरात मोठी उलथापालथ; देशमुख कुटुंबाला मोठा धक्का
राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार, शपथविधीबाबत मोठी अपडेट समोर
राज ठाकरेंना मोठा धक्का, अमित ठाकरेंचा दारूण पराभव
288 मतदारसंघांचा निकाल पाहा एकाच ठिकाणी, फक्त एका क्लिकवर