Mahayuti Govt | विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाल्यानंतर शपथविधीचा कार्यक्रम कधी पार पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महायुतीमधील तिन्ही प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्रीपदी कुणाला संधी मिळणार, ते ठरवले जाईल. त्यापूर्वीच एका मागणीची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. (Mahayuti Govt)
राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केलेल्या मागणीने राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. भाजपला मिळालेल्या यशामागे ओबीसी समाजाचा मोठा वाटा असल्याची चर्चा सुरू असतानाच ओबीसी नेते तथा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. या भेटीनंतर वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.
ओबीसी महासंघाची नवी मागणी
ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी राज्यात ओबीसींच्या हिताचं रक्षण करणारे मुख्यमंत्री असावे, अशी मागणी केली आहे. गेल्या दीड वर्षात मराठा समाजाने जे आंदोलन केलं. त्याच वेळेस ओबीसी समाजाने आंदोलन उभारलं होतं. मराठा समाजाला संपूर्ण आंदोलनात काहीच मिळाले नाही. पण, एकनाथ शिंदे यांच्या सरकारने जातीय जनगणना सोडल्यास ओबीसींच्या सर्व मागण्या मान्य केल्या. बाकीच्या मागण्यासंदर्भातही शासन निर्णय निघाले आहेत. हा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विजय आहे, असं बबनराव तायवाडे यांनी म्हटलं आहे. (Mahayuti Govt)
नव्या मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांच्या दबावाला बळी पडू नये. राज्यात ओबीसींच्या हिताचं रक्षण करणारे मुख्यमंत्री असावे, अशी मागणी देखील बबनराव तायवाडे यांनी केली आहे. तसेच आमच्या उर्वरित मागण्या पूर्ण करण्यासाठी नवीन सरकार ओबीसी समाजाला सहाय्य करेल, अशी अपेक्षा देखील तायवाडे यांनी व्यक्त केलीये. यावेळी त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर देखील निशाणा साधला.
महायुतीची आज बैठक
जरांगे पाटलांनी ओबीसी नेते छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांवर टीका केली आहे. ते सगळे नेते आता निवडून आले आहेत. आता पुन्हा नव्याने ते आपली मागणी करू शकतात. पण, कोणतीही मागणी करताना ती संविधानाच्या कक्षेत असावी. याचा अभ्यास त्यांनी करावा आणि नंतर त्या मागणीचा आग्रह करावा, असं बबनराव तायवाडे म्हणाले आहेत.
दरम्यान, आज 26 नोव्हेंबररोजी विधानसभेचा कार्यकाळ संपतो आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तरी, नवे सरकार स्थापन होईपर्यंत राज्यपाल त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची सूचना करतील. आज महायुतीची बैठक असून या बैठकीतच मंत्रीमंडळ आणि मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा होईल. (Mahayuti Govt)
News Title – Mahayuti Govt New demand of OBC federation
महत्वाच्या बातम्या-
पडळकर ते राणे, मंत्रीमंडळात ‘या’ नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी?; वाचा संपूर्ण यादी
एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार; कोण होणार पुढील CM?
आज उत्पत्ती एकादशीला ‘या’ राशींना होणार अचानक धनलाभ!
अभिषेक बच्चनकडून पहिल्यांदाच मोठा खुलासा, म्हणाला,”मला माहित होतं की ऐश्वर्या…”
“मला त्याच्यासोबत झोपायला…”, सई ताम्हणकरच्या खुलाशाने खळबळ