निलंगा | संविधान हेच भारतीय लोकशाहीचा खरा आधार असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून पसरवण्यात येत असलेले भ्रम आणि संविधानावर होत असलेले हल्ले या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले (Ramdas Athawale) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निलंगा येथे ‘संविधान सन्मान सभा’ पार पडली.
संवैधानिक मुल्यांचा जयघोष करत, भारतीय संविधान हे प्रत्येक नागरिकापर्यंत पोचवणे आणि त्याच्या सन्मानार्थ सर्वांनी एकत्र येण्याचा संकल्प सर्वांनी केला. तसेच संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित देशभरातील नागरिकांच्या लेखांचा संग्रह असलेले ‘विचारधारा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा देखील यावेळी संपन्न झाला. यावेळी निलंगेकर यांना प्रचंड मताने विजयी करा, असं आवाहनही त्यांनी केलं.
संभाजी पाटील निलंगेकरांनी (Sambhaji Patil Nilangekar) हा एक अत्यंत देखणा असा कार्यक्रम घेतला असून निवडणुकीत नेत्यांचा, पक्षाचा प्रचार फार होतो. पण या सर्वांचा आधार असलेल्या संविधानाचा प्रचार मात्र कोणी करताना दिसत नाही. पण या कार्यक्रमामुळे लोकांना संविधान कळेल आणि संविधानाच्या नावावर राजकारण करणाऱ्या काँग्रेसचा खरा चेहरा देखील कळेल, अशी भावना आठवलेंनी व्यक्त केली.
देशाच्या स्वातंत्र्यानंतर काँग्रेसवाल्यांनी दोन वेळा डॉ. बाबासाहेबांना ठरवून पराभूत करण्याचे पाप केले आणि त्याच काँग्रेसने लोकसभा निवडणूकीमध्ये मोदी सरकार संविधान बदलणार असल्याचा खोटा भ्रम पसरवून जनतेची फसवणूक केली. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हेच संविधानाचे खरे पाईक असून संविधानाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवा, असं आवाहन त्यांनी केलं.
भारतीय जनता पक्ष हा कायमच भारतीय संविधानाने दाखवलेल्या मार्गावर चालत आला आहे. आदरणीय मोदी साहेबांनी केलेला आहे तितका संविधानाचा आदर सन्मान कोणत्याही काँग्रेसवाल्यांनी केलेला नाही. उलट संविधानाच्या नावावर राजकारण करण्याचे फार मोठे पातक त्यांनी केलं आहे. आज निलंगा मतदारसंघाच्या स्वाभिमानावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. अशावेळी आपल्या संविधानाने आपल्याला दिलेला मतदानाचा सर्वात मोठा अधिकार बजावायचा आहे आणि या संविधानाच्या विरोधात जाणाऱ्या, आपला स्वाभिमान हिसकावू पाहणाऱ्यांना परत त्यांची घरी पाठवून देऊयात, अशी भावना त्यावेळी मी व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुनील माने यांना मोठी जबाबदारी!
‘अजित पवारांची दादागिरी’; ‘त्या’ व्हिडीओने राजकीय वर्तुळात खळबळ
लाडकी बहिण आणि शेतकऱ्यांसाठी सरकारकडून सर्वात मोठी घोषणा!
महायुतीचं सरकार आल्यावर मुख्यमंत्री कोण?; अमित शहांनी अखेर सांगूनच टाकलं
‘माझं आणि हार्दिकचं अजूनही…’; घटस्फोटानंतर नताशाकडून नवा खुलासा