Dhananjay Munde l धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आणि वेंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हीसेसचे डायरेक्टर राजेंद्र घनवट (Rajendra Ghanwat) यांच्या पत्नी मनाली घनवट (Manali Ghanwat) यांचे सोमवारी पुण्यात आकस्मिक निधन झाले. ज्युपिटर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केलेल्या ट्वीटमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दमानिया यांनी मनाली घनवट यांचा मृत्यू आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला असून, “हा नैसर्गिक मृत्यू असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न सुरु आहे,” असा थेट आरोप केला आहे. तसेच, “धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळच्या व्यक्तीच्या पत्नीचा मृत्यू कारणांशिवाय झाला आहे,” असं म्हणत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकरणी आरोप; चौकशीची मागणी :
राजेंद्र घनवट (Rajendra Ghanwat) यांच्यावर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी यापूर्वीच केले होते. दमानिया यांच्या म्हणण्यानुसार, व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हीसेस या कंपनीत घनवट आणि राजश्री धनंजय मुंडे हे दोघेही डायरेक्टर आहेत. त्यांनी 11 शेतकऱ्यांना छळून त्यांच्या 20 कोटींच्या जमिनी केवळ 8 लाख रुपयांत खरेदी केल्याचा आरोप केला गेला आहे.
खूप खूप धक्कादायक !
राज घनवट, जे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे आहेत, त्यांच्या पत्नीच्या आकस्मित मृत्यू झाला आहे. कारण स्पष्ट नाही.
पुण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांना नेण्यात आले होते.
राज घनवट धनंजय मुंडे त्यांच्या कंपन्यात डायरेक्टर आहेत, ह्याच राज घनवट ने… pic.twitter.com/m7LmqE35wD
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) April 21, 2025
या प्रकरणी अंजली दमानिया (Anjali damania) यांनी महसूल मंत्र्याकडे तक्रार दाखल केली असून, गृहमंत्र्यांकडेही सक्त कारवाईची मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. “पर्दाफाश होणारच, कितीही मानहानीची केस दाखल केली तरी मी मागे हटणार नाही,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
Dhananjay Munde l आज पुण्यात अंत्यसंस्कार; तपास मागणीस वेग :
मनाली घनवट यांच्या पार्थिवावर आज पुण्यातील औंध येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, या प्रकरणात कोणतीही गडबड नसल्याची खातरजमा करण्यासाठी सखोल तपास व्हावा, अशी मागणी अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा केली आहे.
संपूर्ण प्रकरण धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या संपर्कातील व्यक्तींबाबत असल्यामुळे हे राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचे मानले जात आहे. मात्र आता या प्रकरणात पुढे काय घडते, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.