Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काल 13 जूनरोजी आपलं उपोषण स्थगित केल्याची घोषणा केली. राज्य सराकारच्यावतीने मंत्री शंभुराज देसाई (Shambhujraj Desai) आणि संदीपान भुमरे यांनी जरांगे यांची भेट घेतली होती.
यावेळी दोन्ही नेत्यांनी जरांगे यांना सगेसोयरेच्या अंमलबजावणीबाबत काम सुरु असल्याची माहिती दिली. तसंच मी पहिल्यांदाच तुमच्याकडे आलो आहे, तुम्ही सरकारला 2 महिन्यांचा अवधी द्यायला हवा, अशी मागणी देखील यावेळी देसाई यांनी केली होती.त्यावर जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी सरकारला 1 महिन्याचा अवधी देत आपलं उपोषण मागे घेतलं.
मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित
तसेच, पुढील 1 महिन्यात मागण्या मान्य न झाल्यास विधानसभा निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी उतरू, असा इशारा देखील जरांगे(Manoj Jarange) यांनी सरकारला दिला आहे. सरकार आणि जरांगे यांच्यात चर्चा होऊनही त्यांचा सरकारच्या आश्वासनावर विश्वास बसत नसल्याचं दिसून येतंय.
जरांगे पाटील यांनी एसआयटी रद्द करण्याबाबत राज्य सरकारची काय भूमिका आहे, त्याबाबत खुलासा केला. “उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा फोन आला. त्यांनी एसआयटी रद्द केल्याचे सांगितले. आता रद्द केली की शेंगा हाणल्या बघावं लागेल. SIT माझी मागणी नाही सागे सोयरे ही माझी मागणी आहे.”, असं जरांगे म्हणाले आहेत.
सरकारला 1 महिन्याचा अवधी
तसंच पुढे ते म्हणाले की, “दहा महिन्यांपासून आम्ही लढत आहोत. हा थोडा वेळ, समाजाला विचारून दिला आहे. याच्यात जर आम्हाला धोका झाला तर, समाजाचा मोठा अपमान आहे. मग मात्र त्यांचे खूप हाल होतील. विधानसभेत काय करायचं त्याबाबत समाजाशी बोलून निर्णय घेणार.”, असा इशाराच जरांगे पाटील यांनी दिला आहे.
तसंच, SIT स्थापन झाले तेव्हा बाकडा न वाजवणारे खासदार आता भेटायला यायला लागले. अनेक आमदार उड्या मारत टेबल वाजवत होते, जे वाजवत नव्हते ते भेटायला येत आहेत, असा टोला देखील जरांगे (Manoj Jarange) यांनी लगावला आहे.
News Title- Manoj Jarange on Devendra Fadnavis
महत्त्वाच्या बातम्या-
“…ताई आज अचानक हिंदू कशी झाली?”, केतकी चितळेच्या वक्तव्याचा किरण मानेंनी घेतला समाचार
अजित पवार ‘या’ घोटाळ्यामुळे पुन्हा अडचणीत सापडणार?
शेतकऱ्यांनो यापुढे कांद्याचे दर वाणिज्य मंत्रालय ठरविणार, शेतकऱ्यांचा फायदा की तोटा?
राज्यातील पावसासंदर्भात हवामान विभागाने वर्तवला महत्वाचा अंदाज!
ज्योती मेटेंची विधानसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा!