Manoj Jarange | मराठा आरक्षणाचा प्रश्न अजूनही महाराष्ट्रात ज्वलंत आहे. राज्यात आता पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झाले आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आहेत. तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शपथविधीचा सोहळा झाल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. (Manoj Jarange)
जरांगे यांनी सरकारला आता नवीन डेडलाईन दिली आहे. पत्रकार परिषदेत जरांगे पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन देखील केले. फडणवीस यांनी पालकत्व स्विकारलं आहे. त्यामुळे आता राज्यातल्या गोर गरीब जनतेची जबाबदारी त्यांच्यावर आलेली आहे, असं जरांगे म्हणाले.
फडणवीस यांना माझ्या शुभेच्छा, आता ते..
“आमच्या मागण्या मान्य करा जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या तिघांनाही विशेष करून सांगतो की आता तरी मराठा समाजाला असं वाटायला नको की तुम्ही समाजाचा द्वेष करता, गरीब लोकांना त्यांच्याकडून न्याय मिळेल अशी मी अपेक्षा करतो”, असं जरांगे म्हणाले.
यावेळी जरांगे यांनी नव्या सरकारला थेट इशारा दिला आहे. “5 जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावावा, 5 जानेवारीपर्यंत संधी दिली आहे, त्याचं सोनं करा. पुन्हा एकदा मराठा समाजाच्या विरोधात गेलात तर सत्ता चालवणं अवघड होईल, पुन्हा एकदा करोडोच्या संख्येनं मराठा समाज अंतरवालीमध्ये येईल.”, असं मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange) म्हणाले आहेत.
5 जानेवारीपर्यंत सरकारला संधी, नंतर…
मागच्या काही दिवसांत मला एकटं पाडण्याचा प्रयत्न झाला. पण हे माझ्या समाजाला सहन होत नाही, असा आरोप करत महायुती सरकारचा मंत्रीमंडळ झाला की सामूहिक उपोषणाबाबत पुढचा काय तो निर्णय घेऊ, असं जरांगे(Manoj Jarange) म्हणाले. त्यांनी आता फडणवीस सरकारला 5 जानेवारीपर्यंत वेळ दिला आहे. यावर सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
News Title – Manoj Jarange warning to CM Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या-
भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन!
नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पुढील 5 वर्षांचा खुलासा म्हणाले, आता सामना…
“पवित्र ठिकाणी असताना कुठे त्या गटाराचं नाव…”, ‘या’ बड्या नेत्यावर चित्रा वाघ यांची टीका
एकनाथ शिंदेंच्या भूमिकेबद्दल देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट!
रेल्वे विभागात नोकरीची सुवर्णसंधी! जाणून घ्या पात्रता आणि रिक्त पदे