Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कालच (3 नोव्हेंबर) विधानसभा निवडणुक लढवणार अशी मोठी घोषणा केली होती. मात्र, आज सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यांनी अचानक माघार का घेतली याची कारणेही त्यांनी सांगितली आहेत. (Manoj Jarange )
मित्रपक्षाची यादी आलेली नाही. त्यामुळे एका जातीवर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. त्यामुळे समाज बांधवांनी आपापले अर्ज काढून घ्यावेत. उमेदवार द्यायचा नाही, आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा, असं आवाहन जरांगे (Manoj Jarange )यांनी केलंय.
जरांगे यांनी माघार का घेतली?
“एका जातीवर निवडणूक लढवून जातीचं हसू करून घेऊ का? राजकारण हा आमचा कुठं खानदाणी धंदा आहे? मी कालपासून सांगतोय, तिघांचं समीकरण आहे, पण यादीच आली नाही, समाजाला एक सांगणं आहे, तुमच्या मतदारसंघातल्या एकाला मदत करायचं तर करा पण त्याच्याकडून लिहून घ्या माघार घेणारी औलाद नाही आमची… एका जातीवर निवडून येत नाही, म्हणून उमेदवार देणार नाही.”, अशी घोषणा जरांगे (Manoj Jarange ) यांनी केली आहे.
“राजकीय प्रक्रिया हाताळणं ही साधी गोष्ट नाही. मी तर या राजकीय प्रकरणात लेकरू आहे. आंदोलनात हजार पाचशे लोक असले तरी चालून जातं. पण, राजकारणात लोकांची गोळाबेरीज करावी लागते.”, असंही जरांगे म्हणाले आहेत.
“..तर जातीचं हसू होईल”
“आम्ही रात्री साडेतीनपर्यंत चर्चेला बसलो होतो. आम्ही या निवडणुकीत मित्रपक्षांसोबत दलित आणि मुस्लीम उमेदवार उभे करणार होतो. पण, एका जातीच्या जोरावर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य होणार नाही. उमेदवार उभा करुन तो पडला तर जातीची लाज जाईल, त्यामुळे आम्ही विधानसभा निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय घेतलाय.”, असं जरांगे म्हणाले.
News Title – Manoj Jarange withdraws from election
महत्त्वाच्या बातम्या-
सिनेइंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
अजितदादांच्या उमेदवारांना शिंदेंकडूनच आव्हान; आता दोन्ही उमेदवार नॉट रीचेबल
“जिथं त्रास दिला, त्याला पाडायचंच..”, जरांगेंचे मतदारसंघ ठरले; वाचा संपूर्ण यादी
आज सोमवार, महादेव ‘या’ ३ राशींवर ठेवणार कृपादृष्टी!
“या निवडणुकीनंतर पवार कुटुंब एकत्र…”, छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य