Walmik Karad | मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील मस्सोजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन आक्रमक झाले आहेत. आता या प्रकरणावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला आहे.
जरांगेंचा फडणवीसांना इशारा
संतोष देशमुख हत्याप्रकरणातील तीन आरोपी फरार आहेत. पोलिसांनी शब्द दिलाय काही दिवसात अटक करु. नाही अटक झाली तर आम्ही आहोतच. सरकारने शब्द दिला, मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला, सगळ्यांना अटक करणार, शिक्षा करणार या शब्दाला ते खरे नाही उतरले तर आम्ही रस्त्यावर येणार, असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय.
मयत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय माझ्याशी चर्चा करण्यासाठी आले होते. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अजून अटक का झाली नाही, याबाबत चर्चा झाली. आमच्या सर्वांची इच्छा आहे सगळे आरोपी अटक होऊन त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे . त्यासाठी आता राज्यभर मोर्चे सुरु झाले आहेत. वाल्मिक कराडला (Walmik Karad) आता अटक झाली, आता पुढचे सापडतील. कोण कोण मोठे मासे आहेत ते सापडतील, असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक न होणे हे गृहमंत्र्यांचे अपयश आहे की नाही हे याबाबत आताच काही सांगता येणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
कोणी कोणाचं लाडक नसतं- मनोज जरांगे
राजकारणात, समाजकारणात काम करतांना कोणी कोणाचं लाडक नसतं, शत्रू नसतो , विरोधक नसतो . ज्या ज्या वेळेस चुकी होईल त्या त्या वेळेस बोलावं लागत, करावं लागत. ते दिलेला शब्द पाळत असतील तर आम्ही अपेक्षा ठेवून आहोत . शब्द नाही पाळला तर आम्ही रस्त्यावर उतरणार, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
वाल्मिक कराडच्या गुन्ह्यांची कुंडली आली समोर! 25 वर्षात तब्बल ‘इतके’ गुन्हे दाखल
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली? ऑक्सिजन लावले… नेमकं काय झालं
‘मी पवार साहेबांना फसवलं, आता त्यांच्यासमोर लोटांगण घालून पाया…’; ‘या’ आमदाराचं मोठं वक्तव्य
अनुराग कश्यपने बॉलिवूड इंडस्ट्रीची काढली अक्कल; घेतला सर्वात मोठा निर्णय
जेवण तर दूरच साधा चहादेखील घेतला नाही…; कराडचा तुरुंगात कसा गेला पहिला दिवस?