ठाणे | कल्याण-डोबिंवलीत यंत्रणा अपूरी पडत आहे. इथे टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रिटमेंट, ट्रॅकिंग हा फॉर्म्युला औषध सापडत नाही. त्यामुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी धारावीप्रमाणे कल्याण-डोंबिवलीचीदेखील पाहणी करावी, अशी मागणी कल्याण-डोंबिवली ग्रामीण मतदारसंघाचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्विटरवर केली आहे.
कल्याण-डोंबिवलीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढताना दिसत आहे. शहरात आज आणखी 6 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 49 वर पोहोचली आहे.
25 डोंबिवली पूर्व, 7 डोंबिवली पश्चिम, 9 कल्याण पूर्व, 7 कल्याण पश्चिम तर टिटवाळ्याचा 1 रुग्ण आहे. यापैकी 8 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून दोघांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीकडून बऱ्याच उपाययोजना केल्या जात आहेत. शहरातील किराणा माल आणि इतर जीवनाश्यक दुकाने सकाळी 5 ते दुपारी 2 वाजेपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
कल्याण डोंबिवली #COVID19 चा #Hotspot बनला आहे. इथे testing, tracing, treatment, tracking,हा फार्मुला औषधाला पण सापडत नाहीये. #COVID19 बाधितांचा माग काढण्यात यंत्रणा अपूरी पडत आहे.धारावीची केली तशी #KDMC ची पाहणी करणे गरजेचे आहे. @rajeshtope11 @CMOMaharashtra @KDMCOfficial
— Raju Patil (@rajupatilmanase) April 10, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
महाराष्ट्रात नक्की चाललंय काय?, गृहमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा- चित्रा वाघ
वाधवान कुटुंबाला फिरण्यासाठी विशेष पत्र देणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यावर गृहमंत्र्यांनी केली कारवाई!
महत्वाच्या बातम्या-
“…म्हणून भाजपनं लोकसभेतही किरीट सोमय्या यांचं तिकीट कापलं”
कोणतंही काम सोपं नसतं, वडिलांचे केस स्वत: कापले- सत्यजीत तांबे
Comments are closed.