Mumbai News | गेल्या काही वर्षभरात तरुण आणि तरुणींवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. अनेक धक्कादायक, क्रूर घटना घडताना समोर येतात. मात्र, आता माणसांप्रमाणेच श्वानांवर देखील होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
नवी मुंबईत अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने प्राणीप्रेमी संताप व्यक्त करत आहेत. भटक्या श्वानांवर उपचार (Treatment) आणि नियंत्रणाचे (Control) काम पालिकेच्या (Municipality) पशुवैद्यकीय विभागाकडून (Veterinary Department) केले जाते. यासाठी श्वान नियंत्रण कार्यक्रम (Dog Control Program) राबविला जात आहे.
नेरुळमध्ये मांजरावर चाकूहल्ला
एका दुकानात आलेल्या मांजराला हाकलण्यासाठी (Drive Away) दुकानदाराने (Shopkeeper) तिच्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना नेरुळमध्ये घडली आहे. या घटनेचा अधिक तपशील (Details) आणि मांजरीची प्रकृती याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
६ हजार श्वानांवर उपचार
आतापर्यंत नवी मुंबईत पालिकेकडून ६ हजार भटक्या श्वानांवर उपचार करण्यात आले आहेत. श्वान नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हे उपचार करण्यात आले आहेत.