कोलकाता | विरोधी पक्षांकडून आम्हाला निवडून दिल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो असं आश्वासन दिलं जात आहे. कर्ज नसणारांनाही विरोधी पक्षांच्या सरकारांनी केलेल्या कर्जमाफीचा लाभ झाला, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
देशातल्या 5 एकरपेक्षा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून 12 कोटी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
आमच्या अगोदर सत्तेत आलेल्या सरकारांनी खेड्यांच्या विकासाकडं दुर्लक्ष केलं, अशी टीका देखील मोदी यांनी केली आहे.
दरम्यान, नागरिकत्व बील आम्ही संसदेत आणणार असून त्याला तृणमूल काँग्रेसनं पाठींबा द्यावा, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
–उदयनराजेंविरोधात शिवसेनेचे नितीन बानुगडे लढणार नाहीत!
–‘कॅप्टनकूल’ धोनी संघात परतणार, कोणत्या खेळाडूला डच्चू मिळणार?
-“शिवसेनेचे गुलाबराव पाटील लंगोट बांधत नाहीत तर खिशात घेऊन फिरतात”
–“माझ्या जिवाला काही बरं वाईट झालं तर जनता मोदींना जबाबदार धरेल”
-राहुल गांधी पाकिस्तानचे आहेत का?- नितीन गडकरी