अमरावती | भाजपप्रणित एनडीए आघाडीतून बाहेर पडल्यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना दिसत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे.
मोदी राजकारणात माझे ज्यूनिअर आहेत. पण आंध्र प्रदेशचे भलं करुन घेण्यासाठी त्यांचा अहंकार दुखवण्याच्या नादात मी पडलो नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
मोदींचा अहंकार संतुष्ट होऊन आंध्राचं भलं व्हावं, यासाठी मी त्यांना 10 वेळेस सर म्हणून संबोधलं आहे, असंही ते म्हणाले.
दरम्यान, भाजपची साथ सोडल्याने लोकसभा निवडणुकीत टीडीपीला 10 जागा जास्तच मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मला वाटलं होतं खूप मोठा उद्रेक होईल, पण हे साले सगळे हिजडे निघाले- निलेश राणे
-गोव्याचे मंत्री म्हणतात, मनोहर पर्रिकर तर दुसरे ‘येशू ख्रिस्त’च!
-निलेश लंकेंनी ‘साधलं टायमिंग’!, प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
–विधानसभेसाठी रोहित पवार कर्जत-जामखेडमधून?, धनंजय मुंडेंनी दिले संकेत
–माझ्या अंदाजांना मटका म्हणणाऱ्यांची कीव येते, तर दानवेंचा पराभव होणारच!