नवी दिल्ली | स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा कराण्यात आल्या. मात्र त्या सर्व घोषणा पोकळ होत्या. त्यामुळे जे शेतकऱ्यांसोबत खोटं बोलले ते आता त्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून चालत आहेत, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी विधेयकावर टीका करणाऱ्या विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.
भारतीय जनसंघाचे नेते दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त नरेंद्र मोदींनी भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. त्यावेळी तो बोलत होते.
दरम्यान, कृषी विधेयकांचा सर्वात जास्त फायदा हा लहान शेतकऱ्यांना होणार असल्याचंही मोदी यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
“शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केला असता तर बरं वाटलं असतं”
नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम बनवणार- राहुल गांधी
नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर; गेल्या 24 तासात ‘एवढे’ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह
बिहार निवडणुकांच्या तारखा जाहीर, तीन टप्प्यांमध्ये होणार बिहारची निवडणूक