मुंबई | राज्य सरकराने केलेली प्लास्टिक बंदी ही पर्यावरणाच्या रक्षणा करण्यासाठी आहे की, पक्षाचा गल्ला भरण्यासाठी आहे, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
प्लास्टिकबंदीचा निर्णय जनतेच्या सुरक्षेसाठी नव्हे तर राजकीय फायदा होण्यासाठी घेतला आहे, विदेशी कंपन्यांच्या दबाबामुळे रिसायकल वस्तुंवर बंदी आणली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, प्लास्टिकबंदीवर जोपर्यंत पर्याय येत नाही आणि तज्ज्ञ समितीचा अहवाल येत नाही तोपर्यंत जनतेवरील दंडाची कारवाई थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-उधार पैसे न दिल्याच्या रागातून तरूणाने केली मित्राची हत्या!
-5 रूपयांच्या पॉपकॉर्नवरून मनसेचा PVR मध्ये राडा
-राज्यसभेसाठी भाजपकडून बाबासाहेब पुरंदरेंची विचारणा?
-कर्जमाफीच्या घोषणेला एक वर्ष झालं, अजूनही शेतकरी प्रतीक्षेत- राजू शेट्टी
-आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक; भवानीसमोर मांडला गोंधळ