बीड | बीडमध्ये आज विविध विकास कामांचं उद्घाटन होत आहे. होऊ घातलेला कार्यक्रम तसा राष्ट्रवादीचा आहे पण या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याला निमंत्रण नाही. तर दुसरीकडे मात्र या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे हे दोघेजण या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावणार आहेत.
1. राष्ट्रवादी विकास करतं नाही फक्त राजकारण करतं.
2. बीड शहर बदलण्यासाठी जयदत्त क्षीरसागर माझ्याकडे आले होते, मी 495 कोटींचा निधी दिला
3. केंद्र आणि राज्याने अनेक योजना शहरांसाठी सुरु केल्यात.
5. ग्रामीण भागात पाच लाख घरं पूर्ण.
6. प्रत्येक शहरात मुलभूत सुविधा पोहोचल्या पाहिजेत.
7. प्रत्येक बेघर कुटुंबाला घर देण्यास सरकार कटिबद्ध.
8. बीडमधील सर्व बेघरांना घर देणार.
9. राज्यातील 10 लाख अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय.
10. 2022 पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचा प्रयत्न.
11. कोणताही गरीब कच्च्या घरात राहणार नाही.
12. बीडकरांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरं.
13. मोदी सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार.