‘100 कोटीच्या हिस्सेदारांची नुसती धावपळ चालली आहे’; ‘या’ भाजप नेत्याचं मोठं विधान
मुंबई | परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख हे सचिन वाझेला पैसे वसूल करायला लावतात. तसेच त्यांना महिन्याचं 100 कोटी वसूल करण्याचं टार्गेट असल्याचा आरोप करत एक पत्र लिहिलं होतं. गृहमंत्र्यांवर एवढे गंभीर आरोप होण्याची आणि ते आरोप एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने करण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना असल्याचं बोललं जात आहे.
महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे काही दिग्गज नेते सध्या दिल्लीला शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा. अशी मागणी विरोधकांनी केली आहे. भाजप आमदार निलेश राणे यांनीही आघाडी सरकारमधील नेत्यांच्या दिल्लीवारीवरून त्यांना खडेबोल सुनावले आहेत.
निलेश राणे यांनी ट्वीट करून राष्ट्रवादीला तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांना चिमटे काढले. “100 कोटीच्या हिस्सेदारांची नुसती धावपळ चालली आहे, लफडी करायची काय गरज होती? या सगळ्यांना आता टाका महाराष्ट्र स्वतःहून प्रगती करेल.” अशा आशयाचं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.
महाविकास आघाडी सरकार तसेच त्यातील पक्ष गेल्या काही महीन्यांपासुन काही ना काही कारणाने चर्चेचा विषय बनत आहेत. रेणू शर्मा प्रकरण असो किंवा पूजा चव्हाण प्रकरण विरोधकांच्या हातात आयतं कोलीत सापडलं असल्याने त्यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर चांगलाच निशाणा साधला. परिणामी सरकारमध्ये अनेक बदलही झाले. निलेश राणे यांनी केलेल्या ट्विटनंतर आता महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठली आहे.
थोडक्यात बातम्या –
उठसुट राजीनामा मागणं असा उद्योग विरोधकांचा सुरु झालाय- संजय राऊत
“राष्ट्रवादीचं डोकं ठिकाणावर आहे का? सत्तेची इतकी लालसा आहे की…”
ना अजित पवार, ना जयंत पाटील; शरद पवार आपल्या ‘या’ विश्वासू माणसाकडे सोपवणार गृहमंत्रिपद?
भाजीवाल्या ‘पांडेजीं’चा डान्स सोशल मीडियावर व्हायरल, पाहा व्हिडीओ
“उद्धवजी, शरद पवार हे शिवसेना संपवायला निघाले आहेत”
Comments are closed.