मुंबई | मुंबईच्या काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड करण्यात आली. मात्र मुंबई काँग्रेसची निवड समिती आणि स्ट्रॅटेजी समितीचं अध्यक्षपद प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात आलं. यावरून भाजप नेते निलेश राणेंनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
काँग्रेसमध्ये एकदा कोणाला पद मिळालं तर तो बाद कसा होईल याकरिता एक मोठा गट तयार असतो. काँग्रेस पक्षाला विरोधक लागत नाही, असं निलेश राणेंनी म्हटलं होतं.
काँग्रेस पक्ष हा खो-खो सारखा आहे. कधी कोणाला खो देतील आणि कधी कोणामुळे कोण बाद होईल हे कोणालाच माहीत नसल्याचं राणे म्हणाले. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
दरम्यान, निलेश राणेंनी केलेल्या या टीकेवर काँग्रेसकडून काय प्रत्युत्तर येत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
काँग्रेस पक्ष हा खो-खो सारखा आहे. कधी कोणाला खो देतील आणि कधी कोणामुळे कोण बाद होईल हे कोणालाच माहीत नसते. काँग्रेसमध्ये एकदा कोणाला पद मिळालं तर तो बाद कसा होईल याकरिता एक मोठा गट तयार असतो. काँग्रेस पक्षाला विरोधक लागत नाही.https://t.co/UKTCw070QO
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 22, 2020
थोडक्यात बातम्या-
“मी मुख्यमंत्री असतो तर बच्चू कडूंचा राजीनामा घेतला असता”
मुंबई पोलिसांच्या अटकेच्या कारवाईनंतर सुरेश रैनाची प्रतिक्रिया, म्हणाला…
शेतकऱ्यांच्या परिस्थितीला पंडित जवाहरलाल नेहरू जबाबदार- मुकेश खन्ना
कोरोनाची लस घेतल्यावर ‘इतके’ दिवस मद्यपान करता येणार नाही!
“उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होणार, भविष्यातील राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू शिवसेना”