मुंबई | मराठ्यांच्या बंदमुळे काहीच साध्य होणार नाही. उलट लोकांची गैरसोयच होणार आहे, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
मागासवर्गीय आयोगाचा अहवाल कोर्टाने स्वीकारल्याशिवाय आरक्षण देऊच शकत नाही, हे चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं. हिंसक आंदोलन करून काहीच साध्य होणार नाही. त्यामुळे आंदोलन मागे घ्यावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
दरम्यान, मराठा क्रांती मोर्चा आरक्षणासाठी आणखी आक्रमक होत अाहे. मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यातही राज्यात काही ठिकाणी बंदला हिंसक वळण लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंना मराठा मोर्चेकऱ्यांची धक्काबुक्की, पिटाळून लावलं!
-काकासाहेबच्या कुटुंबियांना मदत जाहीर; भावाला सरकारी नोकरी देणार!
-महाराष्ट्राची जनता मला विठ्ठल-रखुमाईसारखे- देवेंद्र फडणवीस
-मराठा मोर्चानं आणखी एक मागणी वाढवली, ‘मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!’
-मराठा मोर्चेकऱ्यांकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक!