Pahalgam Attack | दक्षिण काश्मीरच्या (South Kashmir) अनंतनाग (Anantnag) जिल्ह्यातील पहलगाम (Pahalgam) येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. धर्म विचारून हत्या करणारे मुस्लिम असूच शकत नाहीत, असे म्हणत त्यांनी सुरक्षेतील त्रुटींवर बोट ठेवले आणि सरकारला जबाबदार धरले.
हल्लेखोर मुस्लिम नाहीत- आझमी
अबू आझमी (Abu Azmi) म्हणाले की, “जर दहशतवाद्यांनी खरोखरच धर्म आणि नाव विचारून निरपराध पर्यटकांची हत्या केली असेल, तर ते इस्लामचे अनुयायी किंवा मुस्लिम असू शकत नाहीत. इस्लाम अशा कृत्यांना कधीही मान्यता देत नाही आणि असे कृत्य करणारे धर्मातून बहिष्कृत केले जातील.” या हल्ल्यात दोन परदेशी नागरिकांसह २६ जणांचा बळी गेला असून, त्यात महाराष्ट्रातील (Maharashtra) सहा जणांचा समावेश आहे.
पुढे बोलताना आझमींनी (Abu Azmi) सुरक्षेतील ढिलाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “सरकारने जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) एवढी मोठी सुरक्षा यंत्रणा तैनात केल्याचा दावा केला जातो. असे असतानाही हा भीषण हल्ला कसा झाला? निश्चितच सुरक्षेत मोठी चूक झाली आहे,” असे ते म्हणाले.
सरकारची जबाबदारी आणि अमरनाथ यात्रेची चिंता
या हल्ल्याची संपूर्ण जबाबदारी सरकारने स्वीकारायला हवी, अशी मागणी अबू आझमी (Abu Azmi) यांनी केली. ते म्हणाले, “आता लवकरच अमरनाथ यात्रेला (Amarnath Yatra) सुरुवात होत आहे, जी महिनाभर चालेल. या यात्रेकरूंच्या सुरक्षेची हमी घेणे आणि योग्य ती व्यवस्था करणे हे पूर्णपणे सरकारचे कर्तव्य आहे.”
मंगळवारी दुपारी पहलगाममधील (Pahalgam) ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन खोऱ्यात (Baisaran Valley) हा हल्ला झाला. प्रत्यक्षदर्शी आणि अधिकाऱ्यांच्या मते, सशस्त्र दहशतवाद्यांनी रेस्टॉरंटमध्ये बसलेल्या आणि घोड्यावरून फिरणाऱ्या पर्यटकांना लक्ष्य केले. पाकिस्तानस्थित (Pakistan) लष्कर-ए-तैयबा (LeT) (Lashkar-e-Taiba) संबंधित रेझिस्टन्स फ्रंटने (TRF) (The Resistance Front) हल्ल्याची जबाबदारी घेतली असून, हा पुलवामा (Pulwama) (२०१९) नंतरचा खोऱ्यातील सर्वात मोठा हल्ला मानला जातो.
Title : Pahalgam Attack: Abu Azmi Slams Govt Security