Pahalgam Terror Attack | जम्मू काश्मीरमधील (Jammu Kashmir) पहलगाम (Pahalgam) दहशतवादी (Terror) हल्ल्यानंतर केंद्र सरकार आक्रमक झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी बिहारमधील (Bihar) सभेतून पाकिस्तानला (Pakistan) थेट इशारा दिला आहे, तर आज दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गृहमंत्री अमित शाह यांनी एमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसींना फोन करून बैठकीसाठी निमंत्रित केले.
पंतप्रधानांचा इशारा
पंतप्रधान मोदी (Modi) यांनी कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत ५ महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यानंतर, आज बिहारमध्ये (Bihar) एका सभेला संबोधित केले. ‘त्यांची उरली-सुरली जमीन आता मातीत मिसळण्याची वेळ आली आहे,’ अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानला (Pakistan) गर्भित इशारा दिला. हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना कल्पनेपलीकडची शिक्षा दिली जाईल, असेही ते म्हणाले.
याच पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने आज दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत असल्याचे समजते. या बैठकीत सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) राजकीय पक्षांना माहिती देतील.
ओवैसींना शाहांचा फोन
सुरुवातीला या बैठकीसाठी एमआयएमला (MIM) निमंत्रण नव्हते. त्यामुळे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांच्याशी संपर्क साधून आपल्यालाही बैठकीचे निमंत्रण मिळावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर, गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी स्वतः ओवैसींना फोन केला.
“तुम्ही कुठे आहात? तात्काळ दिल्लीला या,” असे अमित शाह (Amit Shah) फोनवर म्हणाल्याचे ओवैसींनी सांगितले. पहलगाम (Pahalgam) हल्ला हा महत्त्वाचा राष्ट्रीय मुद्दा असल्याचे सांगत, आपण तिकीट बुक करून तातडीने दिल्लीला निघालो आहोत, असेही ओवैसींनी स्पष्ट केले. विविध पक्षांच्या नेत्यांशी गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री संवाद साधत आहेत.
Title : Pahalgam Attack: Shah Calls Owaisi for All-Party Meet