पाठक बाईंनी लग्नात घेतलेला भन्नाट उखाणा होतोय व्हायरल

मुंबई | ‘तुझ्यात जीव रंगला'(Tujhyat Jeev Rangla) या राणा दा-पाठक बाईंच्या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या जोडीचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळं रिअल लाईमध्ये या राणा दा-पाठक बाईंनी म्हणजेच हार्दिक जोशी(Hardeek Joshi) आणि अक्षया देवधर(Akshaya Deodhar) यांनी लग्नगाठ बांधल्यानं चाहते आनंदी आहेत.

2 डिसेंबरला हार्दिक-अक्षया लग्न बेडीत अडकले. सध्या त्यांच्या लग्नाचे तसेच हळदी, मेहंदी आणि संगीताच्या कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत. त्यातच अक्षयानं भन्नाट उखाणा घेत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

तिनं घेतलेला उखाणा असा की, खर तर उखाणा असतो दोन ओळींचा फक्त, पण संधी चालून आलीय तर होईन म्हणतेय व्यक्त. कामासाठी घर सोडून धरली वेगळी वाट, प्रेमात पडले कोल्हापूरच्या पाहून शाही थाट. मग राणाजी राणाजी करत दिवस गेले सरून, राणा सारख्या खऱ्या माणसाचा ठेवला हात धरून.

तुझ्यात जीव रंगला म्हणता म्हणता, वेळ आली निघायची, कुठेतरी खात्री होती पुन्हा एकत्र येण्याची. दोघांनी मिळून घेतला निर्णय आयुष्यभराच्या साथीचा,अक्षयतृतीया मुहूर्त ठरला आमच्या साखरपुड्याचा.

उखाणा घेते घेते म्हणत कहानी झाली सांगून, हो हो घेतीय नाव ऐका कान देऊन, उखाण्यासाठी विचार करून शक्कल लढवलीय अशी, माझंही नाव घेते तेवढ्यात अक्षया हार्दिक जोशी.

अक्षयाचा हा उखाणा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तसेच अनेकजण कमेंट्स करत तिच्या या उखाण्याची स्तुती करत आहे.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More